vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय लोकअदालतीचे १४ मार्च रोजी आयोजन

राष्ट्रीय लोकअदालतीचे १४ मार्च रोजी आयोजन

सातारा प्रतिनिधी: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालय, सातारा तसेच सर्व तालुका न्यायालयात शनिवार दि. १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. वाघमारे यांनी दिली आहे.

जिल्हयातील सर्व न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. तडजोड होवू शकणारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवावयावी असल्यास संबंधित न्यायालयात जावून प्रकरण तडजोडीसाठी ठेवावयाचे आहे असे संबंधित अधिक्षक अथवा लिपिक तसेच संबंधित वकिलांना कळवावे. लोक अदालतीत तडजोड झाल्याने कायमस्वरुपी वाद मिटू शकेल, क्षुल्लक वादाचे पर्यावसन कायमस्वरूपी वादात होणार नाही हाच लोक अदालतीचा हेतू आहे. शिवाय लोक अदालतीतील निकालाविरुध्द अपील होत नाही. वेळेची व पैशाची बचत होते.

लोक अदालतीमध्ये दिवाणी, तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी कौटुंबिक वाद, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे ठेवावयाची असल्यास संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहनही प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. वाघमारे यांनी केले आहे

000

संबंधित पोस्ट

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शांत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात  – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील * कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज *प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती

vishwatmaklokswamivarta

मोटार वाहन कर अधिनियमात सुधारणा

S.S.C परीक्षेत नमुंमपा इटीसी दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण केंद्राचा निकाल १००%

भागीदारी संस्था नोंदणीसाठी नवे संकेतस्थळ 2.0 कार्यान्वित;जनतेसाठी अधिक सोयीस्कर आधुनिक सुविधा उपलब्ध होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मतिमंदत्व, बौध्दीक अपंग व मानसिक आजारी व्यक्तींचे न्याय हक्क, सुरक्षितता आणि उपाययोजनाकरीता विधी सेवा प्राधिकरणाकडून “मनोन्याय समिती” ची स्थापना

vishwatmaklokswamivarta