vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जाहीर सभेचे आयोजन**केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कोकण रिपब्लिकन संस्थेतर्फे होणार भव्य सत्कार*

*महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जाहीर सभेचे आयोजन**केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कोकण रिपब्लिकन संस्थेतर्फे होणार भव्य सत्कार*

मुंबई प्रतिनिधी- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासीक चवदार तळे सत्याग्रहाच्या 99व्या वर्धापन दिनी उद्या दिनांक 20 मार्च रोजी चवदार तळे क्रांतीदिनाला अभिवादन करणा-या जाहीर सभेचे आयोजन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने चवदार तळे येथील क्रांती स्तंभाजवळ करण्यात आले आहे. पेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भारतीय दलित पँथरच्या काळापासुन दरवर्षी 20 मार्च रोजी चवदार तळे क्रांतीला अभिवादन करणा-या सभेचे आयोजन केले जात आहे. यंदाही 20 मार्च रोजी सायंकाळी महाड क्रांतीभूमी क्रांती स्तंभाजवळ चवदार तळे क्रांतीला अभिवादन करणा-या सभेचे आयोजन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आले असून त्या सभेस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिली आहे..

 चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्याचा सत्याग्रह नव्हता तर मानव मुक्तीचा समतेचा संगर होता. मानवीहक्काच्या आणि समतेच्या लढयात जागतिक स्तरावर चवदार तळे सत्याग्रह प्रेरणादायी क्रांती ठरलेला आहे. चवदार तळे सत्याग्रह करुन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेच्या आणि मानवतेच्या चळवळीचा पाया रचला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळे येथे उभारलेल्या मानव मुक्तीच्या संगरामुळे आम्हाला प्रेरणा मिळते. चवदारतळयाकाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या मानव मुक्तीच्या संगरातुनच या देशात सामाजिक न्यायाचा उगम झालेला आहे. त्यामुळे जगभरातील समतावाद्यांसाठी चवदार तळयाची क्रांती ही प्रेरणास्थान आहे. असे सांगत ना. रामदास आठवले यांनी चवदार तळे सत्याग्रहाच्या 99व्या वर्धादिनाच्या क्रांतीदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 सलग तीनवेळा राज्यसभेत बिनविरोध निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा भव्य सत्कार कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश धो.मोरे यांनी दिली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे

00000

 

संबंधित पोस्ट

लंडन मधील ऐतिहासिक ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

महाविद्यालय स्तरावरील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

जालना ‘सुपर 50 एआय फार्मर्स’ प्रकल्पाचा शुभारंभ; ऊस शेतीत तंत्रज्ञानाची नवी क्रांती..

कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ 2025’चेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन…

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात १७ कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

vishwatmaklokswamivarta

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले पुणे जिल्ह्यातील दोन सुपुत्र – कौस्तुभ गानबोटे व संतोष जगदाळे या पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.