vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सावत्र आईकडून मारहाण होत असलेल्या बालिकेची सुटका; चाईल्ड हेल्प लाईन व पोलिसांची संयुक्त कारवाई

सावत्र आईकडून मारहाण होत असलेल्या बालिकेची सुटका; चाईल्ड हेल्प लाईन व पोलिसांची संयुक्त कारवाई

बुलढाणा प्रतिनिधी: मलकापूर येथील वरखेड गावात सावत्र आईकडून मारहाण होत असलेल्या 14 वर्षीय बालिकेची चाईल्ड हेल्प लाईन 1098, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व मलकापूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुटका केली.

दि. 22 मार्च 2026 रोजी या घटनेची माहिती चाईल्ड हेल्प लाईनला प्राप्त होताच प्रकल्प समन्वयक शेख सोहेप यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे तसेच बाल कल्याण समिती यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू केली. यानंतर चाईल्ड हेल्प लाईनच्या पथकाने वरखेड येथे भेट देऊन चौकशी केली असता संबंधित बालिकेला सावत्र आईकडून मारहाण होत असल्याचे निष्पन्न झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन तात्काळ मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला कळविण्यात आले.

चाईल्ड हेल्प लाईनच्या पथकाने बालिकेसह तिच्या मोठ्या भावाला ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये आणले. पोलिसांनी चौकशी करून संबंधित सावत्र आईविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बालिकेला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले असता, समितीच्या आदेशानुसार तिला संरक्षण व काळजीच्या दृष्टीने सखी वन स्टॉप सेंटर, बुलडाणा येथे दाखल करण्यात आले. यानंतर चाईल्ड हेल्प लाईनच्या समुपदेशकांनी बालिकेचे समुपदेशन केले. सदर प्रकरणाची पुढील कार्यवाही बाल कल्याण समिती, बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

0000

संबंधित पोस्ट

पालकमंत्र्यांच्या हस्ते संविधान उद्देशिका कोनशिलेचे अनावरण

नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश,मात्र ध्वनी मर्यादेचे पालन बंधनकारक..

vishwatmaklokswamivarta

स्वाधार योजनेंतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

जागतिक ग्राहक दिनाचे 17 मार्च रोजी आयोजन

नागरिकांना जलद सेवा पोहोचवण्यासाठी शासकीय सेवा ऑनलाईन देऊन नागरिकांचे जीवन सुखकर करा-महा आयटी कॉर्पोरेशन मुंबई चे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर

मुंबईनंतर पावसाने पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, पंचगंगा धोक्याच्या पातळीला, पंढरपुरात चंद्रभागा नदीचं पाणी शिरलं