vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पाटण शहरातील रस्त्याचे काम दोन महिन्यात पूर्ण करा; पालकमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

पाटण शहरातील रस्त्याचे काम दोन महिन्यात पूर्ण करा; पालकमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

सातारा  प्रतिनिधी कराड- चिपळूण महामार्गावरील पाटण शहरांतर्गत रस्त्याचे काम खूप दिवसांपासून रखडलेले आहे. तसेच हा रस्ता खूप खराब झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तरी रस्ते विकास महामंडाळने पाटण शहरातील अंतर्गत रस्ता व जुना धांडे पूल पाडून नवा पुलसह रस्ते काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

 जिल्हाधिकारी कार्यालयात पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पाटण शहरातील अंतर्गत रस्त्याच्या कामामुळे वाहन धारकांना पर्यायी रस्ते दिले आहेत. हे रस्ते गावागावातून जात असल्याने या रस्त्यांवरुन अवजड वाहने जाणार नाहीत याची पोलीस विभागाने खबरदारी घ्यावी, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई जड वाहने ही आंबा घाट मार्गे सोडावीत. पाटण एसटी डेपो परिसरातील अतिक्रमणाबाबत न्यायालयाचा लवकर निकाल येईल, येणाऱ्या निकालाप्रमाणे राज्य परिवहन विभागाने कारवाई करावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

पाटण तालुक्यातील अभयचीवाडीसह काही गावांत शेतकऱ्यांचे पिकांचे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. यामुळे येथील शेतकरी हतबल झाले आहेत. यावर उपाय म्हणून शेतीभवती सौर कुंपण अथवा चर यापैकी जो पर्याय प्रभावी आहे तो करावा. यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाहीही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत दिली.

नाव गावातील ग्रामस्थ पिढ्यानं पिढ्या वन विभागाची जमीन कसत असून त्यांची उपजिविका त्यावर अवलंबून आहे. ही जमीन वन विभागाने ताब्यात घेतली आहे. कसणाऱ्या शेतकऱ्यांना ही जमिन मिळावी यासाठीचा प्रस्ताव आयुक्तांमार्फत शासनाला सादर करा. याबाबत महसूल व वन यांची मंत्रालयात संयुक्त बैठक घेण्यात येईल व सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

दशसूत्री’ची प्रेरणाः वैष्णवीला आधार कृत्रिम पायाचा-दिव्यांग विद्यार्थिनीच्या सक्षमतेसाठी एकवटली शाळा अन गाव…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरण

निवडणूक आयोगाकडून बीएलओ आणि पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ..

स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा भाग म्हणून, भारतीय नौदलाचा बँड मुंबईतील विविध महत्त्वाच्या ठिकाणी सादरीकरण करणार

महिला बचत गटांच्या उत्पादनांचे सांगलीत २८ मार्चपासून तीन दिवसीय प्रदर्शन

जिल्ह्यात ७५१ पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण