vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात ८ ते २५ एप्रिलदरम्यान ‘अमृत परिवार सर्वेक्षण अभियान’ 

जिल्ह्यात ८ ते २५ एप्रिलदरम्यान ‘अमृत परिवार सर्वेक्षण अभियान’

रायगड -अलिबाग, प्रतिनिधी — महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी ‘अमृत परिवार सर्वेक्षण अभियान’ राबविण्यात येणार आहे. हे अभियान ८ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे.
अमृत संस्थेच्या माध्यमातून अशा जाती-जमातींना लाभ दिला जातो, ज्यांना इतर कोणत्याही संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही. सध्या ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य आदी जातींचा अमृतच्या लक्षित गटात समावेश आहे
या सर्वेक्षण मोहिमेदरम्यान अमृत संस्थेचे प्रतिनिधी संबंधित कुटुंबांशी थेट संपर्क साधून त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीची माहिती संकलित करणार आहेत. तसेच विविध सामाजिक संस्था, संघटना आणि मंडळांकडूनही माहिती घेतली जाणार आहे.
अमृतच्या योजनांमध्ये विद्यार्थी, तरुण, महिला, व्यावसायिक आणि शेतकरी अशा कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी विविध उपक्रमांचा समावेश असून, या योजनांचा लाभ जास्तीत जास्त पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
लक्षित गटातील व्यक्ती, संस्था व संघटनांनी या कालावधीत अमृतच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून आपल्या कुटुंबाची नोंदणी करावी व योजनांची सविस्तर माहिती घ्यावी, असे आवाहन अमृतच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
संपर्कासाठी शैलेश मराठे (९११२२२८७५९),मंगेश ढेबे (८१४९५५२१४३)अधिक माहितीसाठी अमृतच्या अधिकृत संकेतस्थळाला https://mahaamrut.org.in/भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, रायगड महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)शैलेश मराठे यांनी केले आहे.
००००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’व ‘यलो अलर्ट’ नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत”जमीन विक्रीसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

उन्हाळी भुईमुग पिकासाठी शंभर टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अमडापूर येथे 8 मार्च रोजी विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा

मद्यपान, तंबाखू आणि धूम्रपानासारख्या कायद्याने आक्षेपार्ह असलेल्या जाहिरातींच्या रेल्वेमधील प्रदर्शनावर बंदी: अश्विनी वैष्णव

जालना जिल्ह्यासाठी 8 हजार 515 कोटींच्या वार्षिक पत आराखड्याचे प्रकाशन• पीक कर्ज, कृषी व एमएसएमई क्षेत्राला प्राधान्य• वार्षिक पत आराखड्यात बँकांची 101 टक्के उद्दिष्टपूर्ती