vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात ८ ते २५ एप्रिलदरम्यान ‘अमृत परिवार सर्वेक्षण अभियान’ 

जिल्ह्यात ८ ते २५ एप्रिलदरम्यान ‘अमृत परिवार सर्वेक्षण अभियान’

रायगड -अलिबाग, प्रतिनिधी — महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी ‘अमृत परिवार सर्वेक्षण अभियान’ राबविण्यात येणार आहे. हे अभियान ८ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे.
अमृत संस्थेच्या माध्यमातून अशा जाती-जमातींना लाभ दिला जातो, ज्यांना इतर कोणत्याही संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही. सध्या ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य आदी जातींचा अमृतच्या लक्षित गटात समावेश आहे
या सर्वेक्षण मोहिमेदरम्यान अमृत संस्थेचे प्रतिनिधी संबंधित कुटुंबांशी थेट संपर्क साधून त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीची माहिती संकलित करणार आहेत. तसेच विविध सामाजिक संस्था, संघटना आणि मंडळांकडूनही माहिती घेतली जाणार आहे.
अमृतच्या योजनांमध्ये विद्यार्थी, तरुण, महिला, व्यावसायिक आणि शेतकरी अशा कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी विविध उपक्रमांचा समावेश असून, या योजनांचा लाभ जास्तीत जास्त पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
लक्षित गटातील व्यक्ती, संस्था व संघटनांनी या कालावधीत अमृतच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून आपल्या कुटुंबाची नोंदणी करावी व योजनांची सविस्तर माहिती घ्यावी, असे आवाहन अमृतच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
संपर्कासाठी शैलेश मराठे (९११२२२८७५९),मंगेश ढेबे (८१४९५५२१४३)अधिक माहितीसाठी अमृतच्या अधिकृत संकेतस्थळाला https://mahaamrut.org.in/भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, रायगड महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)शैलेश मराठे यांनी केले आहे.
००००

संबंधित पोस्ट

आताची बातमी – बीड जिल्हा चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सहा आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन वाशी चौकातील अश्वारूढ शिवपुतळ्यास वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण‘जय शिवाजी – जय भारत’ पदयात्रेत नागरिकांसह मोठ्या संख्येने युवकांचा उत्साही सहभाग..

vishwatmaklokswamivarta

२१ जुलै रोजी जालना येथे संविधानिक हक्कांसाठी मोर्चा; समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष गणेश चांदोडे यांचे आवाहन

अभय योजनेचा लाभ घेण्याची 31 मार्च शेवटची संधी !थकबाकीवर ५० टक्के शास्ती माफी ३१ मार्च २०२६ रोजी रात्री 12 वाजेपर्यंतच मिळणार!

पूर्णा नदीवरील साखळी बंधाऱ्यांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

रोबोटिक बोयो” ठरतोय खऱ्या अर्थाने जीवनरक्षक..विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल*