vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विमुक्त जाती-भटक्या जमातीतील कलाकार व कारागिरांसाठीच्या नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

विमुक्त जाती-भटक्या जमातीतील कलाकार व कारागिरांसाठीच्या नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी – विमुक्त जाती व भटक्या जमातीतील पारंपारिक लोककलाकार आणि कारागिरांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी नटराज पुरस्कार व विश्वकर्मा पुरस्कार देण्यात येणार असून इच्छुक व्यक्ती व संस्थांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सातारा यांनी केले आहे.

विमुक्त जाती व भटक्या जमातीकरिता सामाजिक, कलात्मक व प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पारंपारिक लोककलाकार, लोककलावंत तसेच पारंपारिक कारागिरांना या योजनेअंतर्गत सन्मानित करण्यात येणार आहे. विभागस्तरावर एकूण ७ पुरस्कार देण्यात येणार असून राज्यस्तरावरही पुरस्कार प्रदान करण्यात येतील. राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये महिलांसाठी एक व पुरुषांसाठी एक पुरस्कार राखीव ठेवण्यात आला आहे.

पुरस्कारप्राप्तांना शासनमान्य सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल किंवा साडी-खण व श्रीफळ देण्यात येणार आहे. यासोबतच रु. २५,००० ते रु. ५१,००० पर्यंतची रोख रक्कम किंवा धनादेश स्वरूपात आर्थिक पुरस्कारही दिला जाणार आहे.

या पुरस्कारासाठी पात्रतेमध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी सामाजिक, कलात्मक किंवा प्रबोधन क्षेत्रात किमान १० वर्षे कार्य केलेले असणे आवश्यक आहे. पुरुष अर्जदारांचे वय ४५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आणि महिलांचे वय ४० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे. अपवादात्मक प्रकरणांमध्ये वय मर्यादेत शिथिलता देण्याचा अधिकार निवड समितीकडे राहील. तसेच एकाच व्यक्तीस हा पुरस्कार एकापेक्षा अधिक वेळा दिला जाणार नाही.

पात्र व्यक्ती किंवा संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह ४ प्रतींमध्ये प्रस्ताव दि. ८ एप्रिल २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे सादर करावेत. प्रस्तावासंदर्भातील अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थ्यांशी संवाद-गावागावातील लाभार्थ्यांचा उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद.महिला लाभार्थ्यांचा थेट शिवारातून उपक्रमात सहभागविभागीय आयुक्तांकडून अडचणी सोडविण्याबाबत महिलांना आश्वासन500 वर बचत गटातील 6 हजार महिला सहभागी…

मेघालयातील लैतल्यंगकोट गावाजवळ शिलाँग–डावकी मार्गावर मोठी भूस्खलनाची घटना घडल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद

मातोश्री मुलींचे वसतिगृह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी सक्षम आधार

जालना महापालिकेत GST अनुदान मंजूर झाल्याबद्दल आनंद…

सीमा सुरक्षा दलाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आणि भारताच्या राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षानिमित्त, बीएसएफच्या पहिल्या सर्व-महिला गिर्यारोहक पथकाने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर केले

मुंबई विमानसेवा आता दररोज सुरू होणार जळगाव मुंबई 26 तारखेपासून सुरू होणार

vishwatmaklokswamivarta