vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विमुक्त जाती-भटक्या जमातीतील कलाकार व कारागिरांसाठीच्या नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

विमुक्त जाती-भटक्या जमातीतील कलाकार व कारागिरांसाठीच्या नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी – विमुक्त जाती व भटक्या जमातीतील पारंपारिक लोककलाकार आणि कारागिरांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी नटराज पुरस्कार व विश्वकर्मा पुरस्कार देण्यात येणार असून इच्छुक व्यक्ती व संस्थांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सातारा यांनी केले आहे.

विमुक्त जाती व भटक्या जमातीकरिता सामाजिक, कलात्मक व प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पारंपारिक लोककलाकार, लोककलावंत तसेच पारंपारिक कारागिरांना या योजनेअंतर्गत सन्मानित करण्यात येणार आहे. विभागस्तरावर एकूण ७ पुरस्कार देण्यात येणार असून राज्यस्तरावरही पुरस्कार प्रदान करण्यात येतील. राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये महिलांसाठी एक व पुरुषांसाठी एक पुरस्कार राखीव ठेवण्यात आला आहे.

पुरस्कारप्राप्तांना शासनमान्य सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल किंवा साडी-खण व श्रीफळ देण्यात येणार आहे. यासोबतच रु. २५,००० ते रु. ५१,००० पर्यंतची रोख रक्कम किंवा धनादेश स्वरूपात आर्थिक पुरस्कारही दिला जाणार आहे.

या पुरस्कारासाठी पात्रतेमध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी सामाजिक, कलात्मक किंवा प्रबोधन क्षेत्रात किमान १० वर्षे कार्य केलेले असणे आवश्यक आहे. पुरुष अर्जदारांचे वय ४५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आणि महिलांचे वय ४० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे. अपवादात्मक प्रकरणांमध्ये वय मर्यादेत शिथिलता देण्याचा अधिकार निवड समितीकडे राहील. तसेच एकाच व्यक्तीस हा पुरस्कार एकापेक्षा अधिक वेळा दिला जाणार नाही.

पात्र व्यक्ती किंवा संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह ४ प्रतींमध्ये प्रस्ताव दि. ८ एप्रिल २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे सादर करावेत. प्रस्तावासंदर्भातील अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर अमेरिकेतील ‘आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर’ पुरस्कार

वर्धा जिल्ह्यातील ‘बोर’, ‘धाम’ सिंचन प्रकल्पांच्या नुतनीकरणासाठी ४२८ कोटी ९६ लाख..

ऑरिक स्मार्ट सिटीने औद्योगिक उत्कृष्टता आणि परिवर्तनाची सहा वर्षे केली साजरी विविध प्रकल्पांमुळे 71,343 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह, 62,405 रोजगारांचीही निर्मिती होणार बिडकिन औद्योगिक क्षेत्रात 49 सूक्ष्म – लघु आणि मध्यम उद्योग, 27 मोठे प्रकल्प आणि 4 बिगर सूक्ष्म – लघु आणि मध्यम उद्योगांना भूखंडांचे वाटप

vishwatmaklokswamivarta

अहमदाबादमधील मेघानी नगर इथं सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ विमान अपघात.

राज्यस्तरीय बाजार समित्यांचे सक्षमीकरण करताना शेतकरी हित व सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण गरजेचे – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई पोलिसांचे डीसीपी डॉ. सुधाकर पठारे यांचे हैदराबादमध्ये रस्ते अपघातात निधन…