vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुंबई विमानसेवा आता दररोज सुरू होणार जळगाव मुंबई 26 तारखेपासून सुरू होणार

मुंबई विमानसेवा आता दररोज सुरू होणार जळगाव मुंबई 26 तारखेपासून सुरू होणार

राज्य प्रतिनिधी-ऑक्टोबरपासून जळगाव-मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार आहे. सध्या ही सेवा आठवड्यातून फक्त चार दिवस सुरू होती. अलायन्स एअर कंपनीच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईसाठी व्यापार, उद्योग, शिक्षण, मंत्रालयीन कामकाज आणि वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते, त्यामुळे दररोज विमानसेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना केवळ दीड तासांत मुंबई गाठता येणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुंबई विमानतळावरून सायंकाळी सात वाजता जळगावसाठी विमान उड्डाण घेईल आणि रात्री आठ वाजून पंचवीस मिनीटांनी जळगाव विमानतळावर पोहोचेल. त्याचप्रमाणे जळगावहून मुंबईसाठी रात्री आठ वाजून पन्नास मिनीटांन विमान उड्डाण घेईल आणि मुंबई विमानतळावर रात्री दहा वाजून दहा मिनीटांनी पोहोचेल. सध्या २६ ऑक्टोबरपर्यंत मुंबईहून जळगावसाठी रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी विमानसेवा सुरू आहे. तर जळगावरून मुंबईसाठी रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी विमानसेवा सुरू आहे. २६ ऑक्टोबरनंतर दोन्ही बाजूने दररोज विमानसेवा उपलब्ध असेल

उडान योजनेंतर्गत जळगाव विमानतळावरून गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद या शहरांसाठी सध्या विमानसेवा सुरू आहे. प्रवाशांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे जळगाव-मुंबई विमानसेवा दररोज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे जळगाव आणि मुंबई या शहरांमधील प्रवास आणखी सोयीस्कर आणि वेगवान होणार आहे. प्रवाशांना वेळेची बचत होईल आणि दोन्ही शहरांमधील संपर्क अधिक मजबूत होईल. अलायन्स एअरच्या या निर्णयामुळे उडान योजनेंतर्गत जळगाव विमानसेवा अधिक लोकप्रिय होईल आणि प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील.

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील कारागृह ग्रंथालयांसाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्याकडून बुककेस आणि बुकरॅक देण्याचा निर्णय कारागृहातील वाचनसंस्कृतीस चालना; बंदिवानांसाठी वाचनाची नवी संधी

कोटी रुपये मोजा अन् आरोग्य योजना राबवाच्या नावाखाली राज्यात ८०० कोटींचा गैरव्यवहार-आ.कैलास गोरंटयाल यांचा अधिवेशनात खळबळजनक आरोप @ उच्चस्तरीय चौकशी करण्याची केली मागणी

vishwatmaklokswamivarta

आताच मोठी बातमी-अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️ पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू!

गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवावा* – *पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील 6 हजार 955 मतदान केंद्रे मतदानासाठी सज्ज,नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे-जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे

vishwatmaklokswamivarta

नायर महाविद्यालय व रूग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचे लोकार्पण सोयी – सुविधांच्या निर्मितीमधून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासनाचे काम- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे