‘जग विक्रम’ जहाजाचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास;एलपीजी (LPG) कार्गो घेऊन १५ एप्रिलला मुंबईत पोहोचणार! 🇮🇳
नवी दिल्ली प्रतिनिधी -जग विक्रम’ जहाजाचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास;एलपीजी (LPG) कार्गो घेऊन १५ एप्रिलला मुंबईत पोहोचणार! 🇮🇳
मध्य आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वजवाहक एलपीजी जहाज ‘जग विक्रम’ (Jag Vikram) आज होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) ओलांडून सुरक्षितपणे पुढे सरकले आहे.
हे जहाज सुमारे २०,४०० मेट्रिक टन एलपीजी (LPG) कार्गो घेऊन भारताकडे येत आहे.जहाजावर २४ भारतीय खलाशी असून ते सर्व सुरक्षित आहेत.
अशी ही माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालय यांनी दिलेली आहे