vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राहुरी पोटनिवडणुकीत प्रचारानंतर बाहेरील कार्यकर्त्यांवर निर्बंध

राहुरी पोटनिवडणुकीत प्रचारानंतर बाहेरील कार्यकर्त्यांवर निर्बंध

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी :- राहुरी विधानसभा पोटनिवडणूक २०२६ पारदर्शक व शांततेत पार पडावी यासाठी प्रचार कालावधी संपल्यानंतर मतदारसंघाबाहेरील राजकीय कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्यास बंदी घालण्यात आली असून हे निर्बंध २१ एप्रिल सायंकाळी ६ वाजल्यापासून २४ एप्रिलपर्यंत लागू राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जारी केले आहेत.

मतदारसंघात मुक्त व निष्पक्ष मतदानाचे वातावरण अबाधित राहावे यासाठी प्रचार संपल्यानंतर बाहेरील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, मिरवणूक व प्रचार पथकातील सदस्य यांना तत्काळ मतदारसंघ सोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

निवडणूक प्रशासनाकडून या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामध्ये कल्याण मंडप, मंगल कार्यालये व सामुदायिक सभागृहांची तपासणी करून बाहेरील व्यक्तींचा निवास आहे का याची पडताळणी केली जाईल. तसेच निवासगृह व अतिथिगृहांमधील राहणाऱ्यांची नोंद तपासली जाईल.याशिवाय मतदारसंघाच्या सीमांवर तपासणी नाके उभारून बाहेरील वाहनांच्या येण्या-जाण्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. संशयित व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी ओळखपत्रांची तपासणी करून ते मतदार आहेत की नाही याची खात्री केली जाईल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.0

000

संबंधित पोस्ट

अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी जनजागृती व प्रत्यक्ष कारवाईवर भर द्या- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

आयुष्मान भारत योजनेचा लाभ वेळेत द्यावा – पालकमंत्री संजय शिरसाट पालकमंत्र्यांनी घेतला विविध विषयाचा आढावा

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २६ एप्रिल रोजी; पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा..

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील भरती प्रक्रिया पारदर्शक व ऑनलाईन होणार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सात जिल्ह्यांमध्ये भारतीय रेल्वेच्या दोन बहुमार्गिका प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता; यामुळे रेल्वेचे जाळे सुमारे 318 किलोमीटरने वाढणार

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे – अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी कृषी विभाग-एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आयोजित चर्चासत्रात महिला शेतकरी केंद्रस्थानी

vishwatmaklokswamivarta