vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

माविमची साथ आणि परिश्रमाच्या जोडीतून अगरबत्ती उद्योगाचा दरवळ

माविमची साथ आणि परिश्रमाच्या जोडीतून अगरबत्ती उद्योगाचा दरवळ

छत्रपती संभाजीनगर,- पैठण तालुक्यातील ईसरवाडी येथील वर्षा अशोक ढाकणे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत एकता लोकसंचालित साधन केंद्राच्या मार्गदर्शनातून अगरबत्ती व्यवसाय उभारून स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केला आहे.

वर्षा ढाकणे या स्वामी समर्थ महिला बचत गटाच्या सदस्य असून त्यांचे कुटुंब दोन मुली व एक मुलगा असे आहे. पती कंपनीत नोकरीला असून त्या स्वतः मजुरी करत होत्या. मात्र या उत्पन्नावर कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण जात होते. त्यामुळे त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला केवळ १६०० रुपयांमध्ये अगरबत्तीचा कच्चा माल आणून त्यांनी छोट्या प्रमाणात विक्री सुरू केली. व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी मशीन घेण्याचा विचार केला. यासाठी आवश्यक भांडवल नसल्याने त्यांनी माविम अंतर्गत एकता लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून बचत गट स्थापन केला.

गटातून अंतर्गत कर्ज मिळाल्यानंतरही मोठ्या गुंतवणुकीसाठी अधिक निधीची गरज होती. यासाठी साधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली आयसीआयसीआय बँकेकडून सुमारे २ लाख रुपयांचे कर्ज मिळाले. या निधीतून त्यांनी अगरबत्ती तयार करण्यासाठी मशीन, मिक्सर व ड्रायर खरेदी करून उत्पादन सुरू केले.सध्या त्यांच्या उद्योगातून दररोज ३० ते ५० किलो अगरबत्ती उत्पादन होते. वाढत्या मागणीमुळे त्यांनी घाऊक विक्रीही सुरू केली असून महिन्याला सुमारे २००० किलो उत्पादन केले जाते. या व्यवसायातून त्यांना दरमहा ४० ते ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

या उत्पन्नातून त्यांनी अडीच एकर शेती तसेच एक प्लॉट खरेदी केला आहे. आज त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या असून इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

माविम आणि एकता लोकसंचालित साधन केंद्राच्या वेळेवर मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच हे यश मिळाल्याचे त्या सांगतात. महिलांनीही उद्योगधंद्यात पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

गुंतवणूकदारांनी राज्याच्या जहाज बांधणी उद्योगाच्या विकासात योगदान द्यावे- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे जागतिक बंदरे आणि जहाज परिषदेत महाराष्ट्राच्या सागरी विकासाची दिशा

vishwatmaklokswamivarta

प्रशासकीय यंत्रणांद्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती  अत्याचार प्रतिबंध अधिनियमाची  प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक- मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन

राष्ट्रीय लोकअदालतीचे १४ मार्च रोजी आयोजन

जिल्ह्यात चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी-विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता…

रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा*१७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्त्यांचा समावेश* 

vishwatmaklokswamivarta