vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बंगाल, आसाम व पदुचेरी विधानसभेत भाजपाचा विजय ,जालन्यात भाजपाचा फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष

बंगाल, आसाम व पदुचेरी विधानसभेत भाजपाचा विजय ,जालन्यात भाजपाचा फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष

 

जालना (प्रतिनिधी) : पश्चिम बंगाल, आसाम व पदुचेरी विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात आज विजय जल्लोष साजरा करण्यात आला. जालना शहरातील वीर सावरकर चौक येथे आयोजित या कार्यक्रमाला माजी मंत्री आ.बबनरावजी लोणीकर, माजी आमदार कैलासजी गोरंटयाल, भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, उपमहापौर राजेश राऊत, बद्रीनाथ पठाडे, युवानेते अक्षय गोरंटयाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

कार्यक्रमाची सुरुवात फटाक्यांची आतषबाजी करून करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” आणि “भाजपा जिंदाबाद” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. हा विजय पंतप्रधानांच्या नेतृत्वावर व केंद्र सरकारच्या विकासाभिमुख धोरणांवर जनतेने दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.

 

यावेळी वीरेंद्र धोका, विजय कामड, सिद्धिविनायक मुळे, सोपान पेंढारकर, सुनील पवार, अमोल कारंजेकर, गोविंद ढेंबरे, सुनील खरे, अमोल धानुरे, नारायण पवार, सुजित जोगस, शिवराज नारीयवालेसिद्धेश्वर हाजबे, देविदास देशमुख, राजेश जोशी, शिवराज जाधव, अर्जुन गेही, रोषण चौधरी, रोहित भूरेवाल, दिनेश व्यास, विजय पवार, राजेश शर्मा, नागेश अंभोरे, विकास कदम, बद्रीनाथ जांगडे, उमेश अग्रवाल, विष्णू डोंगरे, शाम उगले, गौरव गोधेकर, राजेश देसार, रमेश दानवे, शिवाजी गायकवाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती.

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर वेळेत अर्ज करावेत

हवामान अनुकूल शेतीसाठी जिल्ह्यांत ‘डिजिटल शेतीशाळा’ 1 एप्रिलपासून तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन· सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातील प्रचाराच्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण बंधनकारक      – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

जलरक्षण हेच सृष्टीसंरक्षण प्रोजेक्ट अमृत अंतर्गत देशभरात 1500 हून अधिक तरजालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी जलस्रोतांची स्वच्छता.भक्ती ही केवळ शब्दांत नव्हे, तर आचरणातून प्रकट व्हावी-सतगुरू माता सुदीक्षा जी महाराज..

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी ‘जल अर्पण दिवस’ उपक्रम 💧

तामिळनाडूत मोठी उलथापालथ, थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाची पदार्पणातच दणदणीत कामगिरी