vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुसूचित जाती व भटक्या जमाती उमेदवारांसाठी राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती;ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

अनुसूचित जाती व भटक्या जमाती उमेदवारांसाठी राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती;ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

        बुलडाणा, प्रतिनिधी : केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 करीता अनुसूचित जाती, विमुक्त भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती, भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर श्रेणीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन सहायक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.
परदेशात शिक्षण घेऊन पदव्युत्तर पदवी किंवा पीएच.डी. अभ्यासक्रमांचे उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. ज्यामुळे त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारते. या योजनेअंतर्गत दरवर्षी एकूण 125 जागा दिल्या जातात, त्यापैकी 115 जागा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी, 6 जागा विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमातींसाठी आणि 4 जागा भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर उमेदवारांसाठी राखीव आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://nosmsje.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.
       पात्रता : अनुसूचित जाती, विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती, भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर उमेदवार असावा. भारताचा रहिवासी असावा, वयोमर्यादा 35 वर्ष, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परिक्षेत व पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परिक्षेत किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत 500 आत असावी

संबंधित पोस्ट

प्रत्येक ग्रामपंचायतीत उभारणार डिजीटल इंडिया सेवा केंद्र-केंद्र शासनाचा पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात कार्यान्वित…

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली ऐरोली विभागातील विविध सेवासुविधांची पाहणी*

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

vishwatmaklokswamivarta

जवाहर नवोदय विद्यालय; 18 जानेवारीला निवड चाचणी परीक्षा· परीक्षेसाठी भरारी पथकांची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सेवानिवृत्त १३ कर्मचाऱ्यांचा सन्मान

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला-सव्वा कोटीहून अधिकची आर्थिक उलाढाल    – पालकमंत्री शंभूराज देसाई