vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुसूचित जाती व भटक्या जमाती उमेदवारांसाठी राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती;ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

अनुसूचित जाती व भटक्या जमाती उमेदवारांसाठी राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती;ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

        बुलडाणा, प्रतिनिधी : केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 करीता अनुसूचित जाती, विमुक्त भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती, भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर श्रेणीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन सहायक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.
परदेशात शिक्षण घेऊन पदव्युत्तर पदवी किंवा पीएच.डी. अभ्यासक्रमांचे उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. ज्यामुळे त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारते. या योजनेअंतर्गत दरवर्षी एकूण 125 जागा दिल्या जातात, त्यापैकी 115 जागा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी, 6 जागा विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमातींसाठी आणि 4 जागा भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर उमेदवारांसाठी राखीव आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://nosmsje.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.
       पात्रता : अनुसूचित जाती, विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती, भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर उमेदवार असावा. भारताचा रहिवासी असावा, वयोमर्यादा 35 वर्ष, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परिक्षेत व पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परिक्षेत किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत 500 आत असावी

संबंधित पोस्ट

अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा कराअन्यथा रास्ता रोको आंदोलन; नागरिकांचा ईशारा

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे ‘स्टॉकहोम कॉन्फरन्स’मध्ये आज भाषण स्वीडनमधील भारतीय समुदायासोबत संस्मरणीय संवाद

महाडीबीटी’ छाननीचे टप्पे कमी करून योजना गतिमान करावी- सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव हा राज्य महोत्सव शांततेत, सुरळीत आणि विनाअपघाती होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. -अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण साळुंके

vishwatmaklokswamivarta

इकरा अपहरण प्रकरणाच्या उच्चस्तरीय तपासाची खा. कल्याण काळे यांची मागणी,शिष्टमंडळाने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

vishwatmaklokswamivarta

आरफळ कालवा उन्हाळी आवर्तनास 15 मे पर्यंत मुदतवाढपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतल्याने लाभधारकांना दिलासा..