vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आरफळ कालवा उन्हाळी आवर्तनास 15 मे पर्यंत मुदतवाढपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतल्याने लाभधारकांना दिलासा..

आरफळ कालवा उन्हाळी आवर्तनास 15 मे पर्यंत मुदतवाढपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतल्याने लाभधारकांना दिलासा..

 

 सांगली, प्रतिनिधी: आरफळ कालव्याच्या सध्या सुरु असणाऱ्या सन 2024-25 मधील उन्हाळी हंगाम पाण्याच्या आवर्तनास 15 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही माहिती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
 आरफळ कालव्याचे उन्हाळी हंगाम पाण्याचे आवर्तन 11 मे रोजी संपणार होते. तथापि, आरफळ कालव्याच्या शेवटच्या भागातील व विसापूर-पुणदी योजनेच्या लाभक्षेत्रामधील लाभधारकांची या संदर्भातील मागणी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तातडीने निदर्शनास आणून दिली व साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी याबाबत समन्वय ठेवला.
 पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही याची तात्काळ दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी उन्हाळी आवर्तन सुरु ठेवण्याबाबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली. तसेच साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी समन्वय ठेवला.
 या चर्चेच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले तसेच तारळी व आरफळ प्रकल्पाचे क्षेत्रीय अधिकारी यांना तारळी प्रकल्पातून सांगली जिल्ह्याकरिता आरफळ कालव्यामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी सोडण्याबाबत सूचना दिल्या. अशा प्रकारे 15 मे पर्यंत उर्वरित 0.11 टीएमसी ऐवजी 0.21 टीएमसी पाणी विसापूर-पुणदीच्या उर्वरित भागास उपलब्ध होणार आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मार्चमध्ये झालेल्या कालवा सल्लागार समितीची बैठकीत सांगली जिल्ह्याकरिता तारळी प्रकल्पातून कोपर्डी लिंकद्वारे उन्हाळी हंगामासाठी 0.99 टीएमसी एवढी तरतूद करण्यात आली होती व सांगली जिल्ह्याकरिता आरफळ कालव्याचे आवर्तन दि. 26 मार्च पासून सुरु करण्यात आले. उन्हाळी हंगामाकरिता अनुज्ञेय 0.99 टीएमसी पैकी 0.88 टीएमसी पाणी 11 मे पर्यंत वापरण्यात आले. आरफळ कालव्याचे सध्या सुरु असणारे सन 2024-25 मधील उन्हाळी हंगाम पाण्याचे आवर्तन 11 मे रोजी संपणार होते. त्यामुळे लाभधारकांकडून उन्हाळी आवर्तन सुरु ठेवावे अशी मागणी होत होती. त्या पार्श्वभूमिवर 15 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने सांगली जिल्ह्यातील आरफळ कालवा व विसापूर-पुणदीच्या लाभधारकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

०००००

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषदेत ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा

vishwatmaklokswamivarta

पंढरपूर पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांसह भाविकभक्तांनी घेतला महाप्रसादाचे लाभ

जागतिक कौशल्य विकास स्पर्धेतील सहभागासाठी जिल्हास्तरीय स्पर्धा

vishwatmaklokswamivarta

पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कच्या पायाभूत सुविधांचा पहिला टप्पा पूर्ण;केंद्रीय सचिव नीलम शमी राव यांनी केली पाहणी

इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी विविध योजना; अर्ज सादर करण्याचे आवाहन

जम्मू काश्मीरच्या पहालगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपाने श्रध्दांजली सभा आणि जोरदार तीव्र स्वरूपात निदर्शने केले

vishwatmaklokswamivarta