मुंबई, पुणे, मराठवाडा आणि अहिल्यानगरला अधिक वेगवान, सक्षम आणि आधुनिक जोडणी देणाऱ्या नेरळ–वांद्रे–पाईट–शिरोली–पाबळ–मळठण–शिरूर या १३४ कि.मी. लांबीच्या चौपदरी महामार्ग प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार
मुंबई, पुणे, मराठवाडा आणि अहिल्यानगरला अधिक वेगवान, सक्षम आणि आधुनिक जोडणी देणाऱ्या नेरळ–वांद्रे–पाईट–शिरोली–पाबळ–मळठण–शिरूर या १३४ कि.मी. लांबीच्या चौपदरी महामार्ग प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार
राज्य प्रतिनिधी -पुणे–शिरूर मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी कमी करून मुंबई व जेएनपीटीशी थेट संपर्क निर्माण करणारा हा मार्ग राज्याच्या विकासासाठी गेमचेंजर ठरणार आहे. रायगड, पुणे, मराठवाडा आणि अहिल्यानगर परिसराच्या आर्थिक, औद्योगिक आणि दळणवळण विकासाला या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळणार आहे.
विशेषतः खेड एसीझेड, तळेगाव, चाकण, रांजणगाव व सुपा औद्योगिक क्षेत्राला या मार्गाचा मोठा फायदा होणार असून खेड, शिरूर, आंबेगाव आणि मावळ परिसरातील विकासाला नवी गती मिळणार आहे. उद्योग, रोजगार आणि गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण करणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरेल.
या प्रकल्पासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी विशेष पाठपुरावा व सातत्यपूर्ण प्रयत्न केले होते. राज्याच्या सर्वांगीण विकासाचे त्यांनी पाहिलेले स्वप्न पुढे नेत हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.