vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ज्यातील कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आ. सुधीर मुनगंटीवार सरसावलेआ. मुनगंटीवार यांची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा; सन २०१७ व २०१९ मधील कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी

ज्यातील कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आ. सुधीर मुनगंटीवार सरसावलेआ. मुनगंटीवार यांची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा; सन २०१७ व २०१९ मधील कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी

राज्य प्रतिनिधी-कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांसह पुनर्गठित कर्जधारक शेतकऱ्यांचा अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्याची आग्रही मागण

मुंबई : राज्यातील कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. सन २०१७ आणि २०१९ मधील कर्जमाफी योजनांमध्ये पात्र ठरूनही विविध तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी पुन्हा एकदा शासनदरबारी प्रभावीपणे मांडला आहे. या वंचित शेतकऱ्यांचा तसेच सन २०१९ मध्ये कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या पात्र शेतकऱ्यांचा अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत तातडीने समावेश करून त्यांना न्याय व दिलासा मिळावा, या मागणीसाठी आ. मुनगंटीवार यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची दि. १६ जून रोजी मंत्रालयात भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी २०१७ व २०१९ च्या कर्जमाफी योजनांतील वंचित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सकारात्मक आणि सविस्तर चर्चा झाली.

सन २०१७ मधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना तसेच सन २०१९ मधील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळू शकला नाही. शासनाने मदतीचा हात पुढे केला, परंतु तांत्रिक त्रुटी, आधार संलग्नीकरणातील समस्या, बँकांच्या प्रक्रियेतील विलंब आणि इतर प्रशासकीय कारणांमुळे अनेक शेतकरी लाभापासून दूर राहिले. याशिवाय सन २०१९ मध्ये कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या अनेक शेतकऱ्यांनाही कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावे लागले. या विलंबाची किंमत मात्र शेतकऱ्यांना मोजावी लागली. मूळ कर्जावर व्याज, दंड व्याज आणि इतर आकारणी वाढत गेल्याने अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली. शासनाच्या शब्दावर विश्वास ठेवून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनात आजही न्याय मिळण्याची अपेक्षा कायम आहे. अनेकांना नव्याने पीककर्ज मिळत नसल्याने त्याचा थेट परिणाम शेती व्यवसायावर होत असून आर्थिक संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत असल्याकडे आ. मुनगंटीवार यांनी सहकार मंत्र्यांचे लक्ष वेधले.

शेतकऱ्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना अन्याय सहन करावा लागत असल्याची खंत व्यक्त करत आ. मुनगंटीवार यांनी अशा सर्व पात्र शेतकऱ्यांची विशेष पडताळणी करून त्यांना अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत तातडीने समाविष्ट करावे, अशी मागणी केली. तसेच सन २०१९ मध्ये पुनर्गठित कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांनादेखील या योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. विलंबामुळे वाढलेले व्याज, दंड आणि इतर आकारणी शासनाने माफ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.

शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे पात्र असूनही कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हे शासनाचे कर्तव्य असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी ठामपणे अधोरेखित केले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या या प्रयत्नांमुळे हजारो शेतकरी कुटुंबांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळावा, यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुंबईत होणार जागतिक मनोरंजन क्षेत्राचे ‘वेव्ज 2025’ संमेलन‘वेव्ज’ संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठीच्या परवाने आणि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा- मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

ग्राहकांनी गॅस सिलिंडरसाठी आगाऊ बुकींग करू नयेजिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन*घरपोच सेवा देण्यासाठी यंत्रणा राबविणार

एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेतनवाढीचा फरक देण्यासाठी महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये, पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्याक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलावीत

सोलापूर येथे रोजगार निर्मितीसाठी आयटी पार्क उभारण्यात येईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दहिटणे आणि शेळगी येथील १ हजार ३४८ सदनिकांचे वितरण