vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेस अद्यापही परवानगी नाही, मनसेकडून मात्र टीझर प्रदर्शित; पोलिसांकडून जमावबंदी आदेश

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेस अद्यापही परवानगी नाही, मनसेकडून मात्र टीझर प्रदर्शित; पोलिसांकडून जमावबंदी आदेश…

मुंबई प्रतिनिधी

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे  यांनी मात्र ट्विटरवरुन मनसेच्या या सभेचा एक टीझरr राज ठाकरे यांनी पोस्ट केला आहे. या टीझरमध्ये औरंगाबाद शहराचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. एका बाजूला मनसेच्या सभेबाबत उत्सुकता असताना दुसऱ्या बाजूला मात्र औरंगाबाद पोलिसांनी सभेला अद्यापही परवानगी दिली नाही.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे येथील सभेत जाहीर केलेल्या 1 मे रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेसाठी मनसे जोरदार तयारी करत आहे. औरंगाबाद पोलीसांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशामुळे ही सभा होणार की नाही याबाबत अद्याप निश्चितता नाही. दरम्यान, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मात्र ट्विटरवरुन मनसेच्या या सभेचा एक टीझर (Raj Thackeray Aurangabad Rally Teaser) पोस्ट केला आहे. या टीझरमध्ये औरंगाबाद शहराचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. एका बाजूला मनसेच्या सभेबाबत उत्सुकता असताना दुसऱ्या बाजूला मात्र औरंगाबाद पोलिसांनी सभेला अद्यापही परवानगी दिली नाही.

शिवाजी पार्क येथील मैदानावर झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेमुळे मनसेचा गुढीपाडवा मेळावा चर्चेत राहिला. या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत भूमिका घेतली होती. राज यांनी केलेल्या भाषणाचे तीव्र पडसाद उमटले. मनसेवर चौफेर टीकास्त्र झाले. मनसेतही पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. एकूणच गोंधळाचे वातावरण पाहून आठ दिवसांमध्ये मनसेने ठाणे येथे दुसऱ्या सभेचे आयोजन केले. या सभेला त्यांनी उत्तरसभा असे नावही दिले.

संबंधित पोस्ट

आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे” – भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

वस्तीशाळेवरील स्वयंसेवकांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेबाबत शासन स्तरावर चर्चा करणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात  २९ नोव्हेंबर! ठाकरे सरकारची विधान परिषदेत परीक्षा….

vishwatmaklokswamivarta

पुणे जिल्ह्यातील मंचर येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने दोघांना चिरडले, पुणे येथे भीषण अपघात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणामधून 11 वर्षात साध्य झालेल्या प्रगतीचा आराखडा, वर्तमानकाळाचे सामर्थ्य आणि समृध्द भारतासाठी आखलेले धोरण स्पष्‍ट – केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

वटपौर्णिमा सणानिमित्त खास ….