
मुंबई ठाणे जिल्ह्यात कल्याण, डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस..
मुंबई प्रतिनिधी
मुंबईसह ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. प्रामुख्याने कल्याण, डोंबिवली आणि ठाणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुसळधार पावसामुळे दुकानात, रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी तुंबल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. प्रामुख्याने कल्याण, डोंबिवली आणि ठाणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुसळधार पावसामुळे दुकानात, रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी तुंबल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात गडगडाटासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. राज्यासोबत देशभरात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आता पुढचे काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. दरम्यान विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नारिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.



