vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सोलापूरात भाजपला मोठा धक्का; 50 गावच्या सरपंच व उपसरपंचांचा BRS पक्षात प्रवेश

सोलापूरात भाजपला मोठा धक्का; 50 गावच्या सरपंच व उपसरपंचांचा BRS पक्षात प्रवेश…

 

सोलापूर प्रतिनिधी

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव  यांच्या भारतीय राष्ट्र समिती  या पक्षाने महाराष्ट्रात पद्धतशीरपणे पाय पसरण्यास सुरुवात केली अशून तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या सीमे जवळील जिल्ह्यांना आता त्यांनी टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. 

सोलापुरातील राजकीय वातावरणात प्रवेश केला होता. शहरातील पूर्व भाग,उत्तर सोलापूर मतदार संघानंतर केसीआर यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यावर लक्ष केंद्रित केले आहे.  दक्षिण सोलापूर तालुक्यातील सचिन सोनटक्के यांनी जवळपास 60 वाहनांचा ताफा व दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावच्या सरपंचाना अशा एकूण 350 जणांना घेऊन हैदराबादकडे रवाना झाले आणि बीआरएस पक्षात प्रवेश केला

पक्ष प्रवेशामुळे सर्वात मोठा झटका हा भारतीय जनता पक्षाला बसला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील 38 गावातील विद्यमान सरपंच, 12 माजी सरपंच, 12 ग्रामपंचायत सदस्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदार संघातील सरपंच व नेते बीआरएसच्या पक्षात गेल्याने भाजपला जबरदस्त हादरा बसला आहे.

आगामी काळात सोलापुरात होणाऱ्या सर्वच निवडणूका बीआरएस पक्ष लढवणार असल्याची माहिती सचिन सोनटक्के यांनी बोलताना दिली.दक्षिण सोलापूर तालुक्यात शेतकरी वर्ग, मतदार हे विद्यमान भाजप आमदराला वैतागलेला आहे. बीआरएस हा पक्ष शेतकऱ्यांसाठी अनुकूल पक्ष आहे,असे सचिन सोनटक्के यांनी सांगितले. अशी ही बातमी लेटेस्ट बातम्यांमध्ये ही आलेली आहे

 

संबंधित पोस्ट

मौजे सिरसवाडी येथील असंख्य युवकांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश…

मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचा सन्मान करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवाहरलाल नेहरु विद्यापीठात ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र’ आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अध्यासन’ केंद्राचे उद्घाटन

नागरिकांनी ई-कचरा संकलन अभियानात सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

विधानसभा निवडणूक-2024-पूर्वपिठीकीचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

सहकार से समृध्दी” कार्यक्रम संपन्न *सातारा जिल्ह्यातील 593 विकास संस्थांना केंद्राची मंजूरी*

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ भारतसाठी आयटीआय पॅटर्न,कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील ७५० गावात स्वच्छता अभियान संपन्न

vishwatmaklokswamivarta