vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

धनगर आरक्षण मुद्दा :जालना दगडफेक प्रकरणी 36 आरोपींची ओळख पटली.

धनगर आरक्षण मुद्दा :जालना दगडफेक प्रकरणी 36 आरोपींची ओळख पटली..

 

राज्य प्रतिनिधी

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे समोर आले होते. त्यामुळे, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करण्यासह शासकीय व खाजगी वाहनांचे नुकसान केल्या प्रकरणी तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

पोलिसांनी 36 ज्ञात आणि दोनशे ते अडीचशे अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा ‘एफआयआर’ समोर आला असून, यात एकूण 36 आरोपींचे नावं समोर आली आहे. 

जालना दगडफेक प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, गांधीचमन येथून निघालेला मोर्चा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. यावेळी अचानक काही लोकांच्या जमावाने आरडाओरडा करत आणि शिवीगाळ करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी या जमावाला शांततेचे आवाहन करून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांच्या आवाहनाला कोणतेही प्रतिसाद म देता या जमावाने जिल्हाधिकारी कार्यालयाचे बाहेरील मेन गट उखडून फेकला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. त्यानंतर या जमावाने शासकीय वाहनांच्या काचा फोडल्या, दुचाकींची तोडफोड केली,झाडांच्या कुंड्यांची तोडफोड केली, दगडफेक करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्या असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार 36 ज्ञात आणि दोनशे ते अडीचशे अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी ही बातमी एबीपी माझावर ही आलेली आहे

 

 

संबंधित पोस्ट

एमपीएससी परीक्षेतील डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागूच राहणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजभवन येथील चंद्रशेखर साखरे शासकीय सेवेतून निवृत्त

vishwatmaklokswamivarta

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव  मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन*5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक*

भाजपा जिल्हा कार्यालयात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व लोकनेते रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची आरती मंगलमय वातावरणात संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुलभूत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी प्रयत्न करणार- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनविविध घटकांशी संवाद

अर्ज द्या कर्ज घ्या’ उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरीत द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी