vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जमिन सुधारणा उपाययोजना राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जमिन सुधारणा उपाययोजना राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

 छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- रासायनिक खतांचा आणि किटकनाशकांच्या वापरामुळे शेत जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कृषी विभागाने जमिन सुधारणा उपाययोजना राबवाव्या व सेंद्रिय शेतीला चालना देणारे उपक्रम राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा आज जिल्हास्तरीय समितीमार्फत घेण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. रमण इंगळे, सहा.आयुक्त मत्स्यव्यवसाय डॉ. मधुरिमा जाधव, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी मनिषा हराळ मोरे, सहा. प्रकल्प संचालक आत्मा डॉ. ए.के. वाडिले, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवाव्या. जेणेकरुन लोकांना विषमुक्त अन्न पिकवून देता येईल.

त्यासाठी सेंद्रीय शेतीला चालना द्यावी. यावेळी प्रधानमंत्री पिक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, वसुंधरा पाणलोट विकास योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की, शेतकऱ्यांना आपत्ती प्रसंगी मदत देण्याच्या योजनांबाबत इ- ऑफिस प्रणालीचा अवलंब करावा. मदत देण्यातली विलंबितता दूर करावी. तसेच महिला बचत गटांना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ देण्यात यावा,असेही निर्देश दिले. 00000

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव पर्यटन रेल्वेगाडीला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार

vishwatmaklokswamivarta

लोणावळा कारला लेणी परिसरातील येथील  एकवीरा देवीची पालखी सोहळा अचानक झाला भक्तांवर मधमाशांचा हल्ला…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष परिवारातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा! सुनेत्राताई अजित पवार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष प्रमुख

राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे नेते बालेंद्र शाह यांनी आज नेपाळच्या पंतप्रधानपदी शपथ घेतली

महिला बचत गटांच्या उत्पादनांचे सांगलीत २८ मार्चपासून तीन दिवसीय प्रदर्शन

राज्यात ठीक ठिकाणी पावसाच्या सरी सुरूच आहे#रायगड आज सकाळी ०६:०० वाजता जारी मध्यम वज्रवृष्टी व धक्क्याने वारे ४१-६१ किमी/तास जोरदार पाऊस > १५ मिमी/तास वैध वेळ: ०९:०० वाजेपर्यंत कृपया सावध रहा व सुरक्षित रहा!

vishwatmaklokswamivarta