vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जमिन सुधारणा उपाययोजना राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जमिन सुधारणा उपाययोजना राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

 छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- रासायनिक खतांचा आणि किटकनाशकांच्या वापरामुळे शेत जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कृषी विभागाने जमिन सुधारणा उपाययोजना राबवाव्या व सेंद्रिय शेतीला चालना देणारे उपक्रम राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा आज जिल्हास्तरीय समितीमार्फत घेण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. रमण इंगळे, सहा.आयुक्त मत्स्यव्यवसाय डॉ. मधुरिमा जाधव, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी मनिषा हराळ मोरे, सहा. प्रकल्प संचालक आत्मा डॉ. ए.के. वाडिले, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवाव्या. जेणेकरुन लोकांना विषमुक्त अन्न पिकवून देता येईल.

त्यासाठी सेंद्रीय शेतीला चालना द्यावी. यावेळी प्रधानमंत्री पिक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, वसुंधरा पाणलोट विकास योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की, शेतकऱ्यांना आपत्ती प्रसंगी मदत देण्याच्या योजनांबाबत इ- ऑफिस प्रणालीचा अवलंब करावा. मदत देण्यातली विलंबितता दूर करावी. तसेच महिला बचत गटांना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ देण्यात यावा,असेही निर्देश दिले. 00000

संबंधित पोस्ट

पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कच्या पायाभूत सुविधांचा पहिला टप्पा पूर्ण;केंद्रीय सचिव नीलम शमी राव यांनी केली पाहणी

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय-देशातील रेल्वे स्थानकांवर चेहरा तपासणी यंत्रणा…

रायगड जिल्ह्यासाठी दि.23 व 24 मे 2026 रोजी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस तसेच ताशी 40 ते 50 किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा

बुलढाणा जिल्हा गुंतवणूक परिषद मंगळवारी- गुंतवणूकदार, उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन- सामंजस्य करार करण्याची संधी

खटाव व दहिवडी येथील मुलांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु

पारंपारिक शेतीला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड द्यावी: जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे*  *कृषी दिनानिमित्त सातारा जिल्हा परिषदेत शेतकरी सन्मान सोहळा संपन्न*