vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जळगाव रेल्वे दुर्घटना धक्कादायक असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी – केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले*

जळगाव रेल्वे दुर्घटना धक्कादायक असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी – केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले*

 

मुंबई प्रतिनिधी- जळगावहुन मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसच्या खाली चिरडल्यामुळे या प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला.जळगावमधील परधाडे स्टेशनजवळ हा भीषण अपघात घडला आहे.हा अपघात अत्यंत धक्कादायक असून या अपघाताची सखोल चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे. हा रेल्वे अपघात अत्यंत भीषण असून हृदयद्रावक आहे.या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची मनशक्ती प्राप्त होवो .मृतांच्या कुटुंबियांना सरकार ने सांत्वनपर निधी द्यावा अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

या दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ होत असून केवळ एका अफवेनं घात गेला अन् क्षणात १० प्रवाशांच्या कुटुंबीयांवर मोठं दु:ख कोसळलं आहे.प्रवशांचा गेलेला जीव पुन्हा येऊ शकत नाही. हा अपघात अत्यंत दुःखद आहे. या अपघातातील मृतांची कुटुंबियांची रेल्वे मंत्रालयाने सांत्वनपर निधी द्यावा. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी. असे अपघात पुन्हा होऊ नयेत यासाठी रेल्वे प्रशासनने खबरदारी घ्यावी आणि प्रवाशांनी ही दक्ष आसवे असे मत ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले. या भीषण अपघाताची पहिली माहिती या रेल्वेत प्रवास करणारे रिपब्लिकन कार्यकर्ते संदीप जाधव यांनी आपल्याला दिली आल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिल.

0000

संबंधित पोस्ट

किल्ले प्रतापगड येथील सुविधांसाठी आवश्यकता भासल्यास देवस्थानची जमीन देवू**- खासदार उदयनराजे भोसले*

vishwatmaklokswamivarta

उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उदंचन जलविद्युत निर्मिती क्षेत्रातील ५६ वा सामंजस्य करार

जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता..

vishwatmaklokswamivarta

मराठी येत नसल्यास रिक्षा चालकांचे परवाने रद्द करणार,बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर कारवाई  ओला, उबर आणि रॅपिडो यांच्या परवान्यांना तात्पुरती स्थगिती,गायमुख ते छत्रपती शिवाजी चौक मेट्रो-१० प्रकल्पाला गती— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २०२६ : बुलढाण्यात २६ एप्रिल रोजी मतदान

विविध कृषी पुरस्कारांकरीता शेतकऱ्यांनी ऑनलाईन संगणक प्रणालीवर अर्ज करावेत