vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मंदिरातील वस्त्रसंहितेविषयी खोटा प्रचार करू नका;वस्त्रसंहिता महिलांसाठी नव्हे, तर सर्वांसाठीच! वकीलांसाठी इंग्रजाळलेला काळा ड्रेसकोड चालतो, तर मंदिरातील ड्रेसकोडविषयी आक्षेप का ? – ‘रणरागिणी’चा सवाल

मंदिरातील वस्त्रसंहितेविषयी खोटा प्रचार करू नका;वस्त्रसंहिता महिलांसाठी नव्हे, तर सर्वांसाठीच! वकीलांसाठी इंग्रजाळलेला काळा ड्रेसकोड चालतो, तर मंदिरातील ड्रेसकोडविषयी आक्षेप का ? – ‘रणरागिणी’चा सवाल

   राज्य प्रतिनिधी-मुंबईतील सुप्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिरात वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) लागू करण्याचा अत्यंत स्तुत्य निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. त्याचे महाराष्ट्रातील समस्त मंदिरांच्या वतीने आम्ही स्वागत करतो आणि त्याला पूर्ण पाठिंबा जाहीर करतो. तसेच मंदिरातील ही वस्त्रसंहिता केवळ महिलांना लागू करण्यात आलेली नसून ती सर्वांसाठीच लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी झेन सदावर्ते यांनी ‘महिलांवर अन्याय’ या स्वरूपाची महिला आयोगाकडे केलेली तक्रार हा खोटा प्रचार आहे. तसेच झेन सदावर्ते यांचे आई-वडिल हे अधिवक्ता असून त्यांना न्यायालयातील इंग्रजाळलेला वकीली ड्रेसकोड अर्थात काळा वकीली पेहराव घालण्याची सक्ती चालत असेल, तर मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरातील वस्त्रसंहितेवरच आक्षेप का? काळ्या वकीली पेहराव घालण्याची सक्ती उठवा, अशी मागणी वा तक्रार सदावर्ते यांनी न्यायालयात कधी केली आहे का, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेच्या कु. प्रतिक्षा कोरगांवकर यांनी केला आहे.

 केवळ मंदिरेच नव्हे, तर देशभरातील अनेक मशिदी, चर्च, गुरुद्वारा आदी अनेक धार्मिक स्थळांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे. न्यायालय, पोलीस, रुग्णालय, शाळा, शासकीय कार्यालये या सर्वच ठिकाणी वस्त्रसंहिता अनेक वर्षे लागू आहे. त्यामुळे केवळ हिंदूंच्या मंदिरामध्ये महिलांवर बंधने आणली जात आहे, हा आक्षेप चुकीचा आहे. हवाई सुंदरींना कमी कपडे घालून अंगप्रदर्शन करण्यास भाग पाडले जाते, याविषयी कोणाला आक्षेप वाटत नाही वा कोणी तक्रार करत नाही; मात्र मंदिरात संस्कृती पालनासाठी सर्वांसाठी केलेल्या नियमांवर आक्षेप घेतला जाणे निंदनीय आहे. मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे, हे ‘व्यक्तीस्वातंत्र्य’ असू शकत नाही. प्रत्येकाला आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र मंदिर हे धार्मिकस्थळ आहे. तेथील भावभक्तीमय वातावरण आणि पावित्र्य यांना समोर ठेवूनच आचरण व्हायला हवे. तेथे व्यक्तीस्वातंत्र्य नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे. त्यामुळे मंदिरामध्ये भाविकांनी येतांना अंगप्रदर्शन करणारे उत्तेजक तथा तोकडे कपडे घालून येऊ नये, असे आवाहन जर मंदिर प्रशासन करते, त्यात चुकीचे काहीच नाही.

  वस्रसंहिता मंदिरांप्रमाणेच चर्चमध्ये आणि मशिदींमध्येही लागू आहेच; मग कधी या विरोधात सदावर्ते यांनी आवाज उठवला आहे का? मद्रास उच्च न्यायालयानेही ‘तेथील मंदिरांत प्रवेश करण्यासाठी सात्त्विक वेशभूषा असली पाहिजे’, हे मान्य करून १ जानेवारी २०१६ पासून राज्यात वस्त्रसंहिता लागू केली, असेही कु. प्रतिक्षा यांनी म्हटले आहे.

 कु. प्रतिक्षा कोरगावकर,रणरागिणी, हिंदु जनजागृती समितीची महिला

संबंधित पोस्ट

क्रिकेट प्रेमींसाठी अवर्णनीय, अविस्मरणीय आनंदाची पर्वणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांकडून चॅम्पियन्स चषक विजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्याची माहिती देण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

2 व 4 जून रोजी यलो अलर्ट जारी हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना 

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करा — रोहयो मंत्री भरत गोगावले #शिवराज्याभिषेक रायगड जिमाका दि. १६– रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तिथी व तारखेनुसार अनुक्रमे ६ व ९ जून रोजी आयोजन करण्यात आले आहॆ. या कार्यक्रमाच्या नियोजनाची रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षते खाली सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी सर्व यंत्रणेला दिल्या. महाड शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अप्पर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे, उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके यांसह विविध विभागाचे अधिकारी व कोकणकडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा आपल्या अस्मितेचा विषय आहॆ. गेली ३५ वर्ष हा उत्सव सुरु आहॆ. या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहॆ. त्यामुळे हा कार्यक्रम सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पडण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे. तेव्हा प्रत्येकाने आपले काम चोखपणे करावे. शिवभक्तांना सर्व सोयी सवलती विहित मुदतीत उपलब्ध करून द्याव्यात त्यामध्ये कुठलेही हयगय करू नये असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यंदा मान्सून लवकर सुरु झाला आहॆ. त्यामुळे पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंडप, भोजन, विद्युत आणि आरोग्य व्यवस्था तैनात ठेवाव्यात. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वैद्यकीय पथक सुसज्ज ठेवावे, गडावर पुरेश्या प्रमाणात वैद्यकीय पथक, स्ट्रेचर, औषधसाठा ठेवावा. विशेषता सर्पदंश होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याप्रमाणे औषधे उपलब्ध ठेवावीत. जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम नियोजनासाठी गठीत केलेल्या समित्यानी आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असेही श्री गोगावले यांनी सांगितले. जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले की,शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या समित्याची नेमणूक केली आहे. मुख्यत्वे आरोग्य,पाणी पुरवठा,मंडप,खानपान, राजशिष्टाचार,परिवहन, विद्युत, पाणी आणि शौचालय आदी सर्व समित्यांची नेमणूक केली आहॆ. सर्व नियोजन सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीत सर्व समित्यानी केलेल्या कामाचा आढावा सादर केला. तसेच कोकण कडा मित्र मंडळाने देखील आवश्यक बाबीबाबत सूचना केल्या.

नरनाळा महोत्सवात ‘इन्व्हेस्टर्स मीट’ : पर्यटन क्षेत्रातील संधींबाबत मंथनगुंतवणूकदारांना सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज जयंती विशेष लेख-जीवन, विचार, सामाजिक परिवर्तन आणि मानवतेचे दीपस्तंभ- संत सेवालाल महाराज.

vishwatmaklokswamivarta