vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

भूमीपुत्रांवर अन्याय होऊ न देता विकास करणे,ही शासनाची भूमिका आहे-परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक

भूमीपुत्रांवर अन्याय होऊ न देता विकास करणे,ही शासनाची भूमिका आहे-परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक

मुंबई: प्रतिनिधी) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) माध्यमातून ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या विकास कामांमध्ये बाधित होणाऱ्या भूमिपुत्रांवर अन्याय होऊ न देता विकास केला जाईल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी केले. ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असलेल्या विविध विकास कामाच्या आढावा बैठकी प्रसंगी बोलत होते. यावेळी एम. एम. आर.डी.ए. चे आयुक्त संजय मुखर्जी अतिरिक्त आयुक्त अश्विन मुद्गगल तसेच मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये मोघरपाडा कार डेपो मध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नसंदर्भात चर्चा झाली. तसेच गायमुख ते फाऊंटन व गायमुख ते दहिसर चेक नाका दरम्यान होणाऱ्या 60 मीटर लांबीच्या रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बरोबर देखील प्रशासनाने चर्चा केली. यामध्ये संबंधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे! तसेच रस्त्याचे विभाजन मध्यभागापासून करण्यात यावे या प्रमुख मागण्या एम.एम.आर.डी.ए. प्रशासनाने मान्य केल्या.

याशिवाय डोंगरी कार शेड व तिथून होणाऱ्या रस्त्या संदर्भात देखील चर्चा झाली. या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी सदर रस्ता हा कमीत कमी बाधित क्षेत्रातून पर्यायी मार्गाने व्हावा अशी मागणी केली. तसेच कार शेड प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या व ख्रिश्चन समुदायाचे श्रद्धास्थान असणाऱ्या ” फातिमा माता ” तीर्थस्थळाचा सन्मान राखून त्याचा विकास करण्याचे देखील निश्चित करण्यात आले.

यावेळी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण होत असून या संबंधित पिण्याच्या पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील जास्तीत लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल, असे नियोजन करावे असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.

या बैठकीला दोन्ही महापालिकेचे अधिकारी एम.एम.आर.डी.ए.चे अधिकारी यांच्याबरोबरच प्रकल्पामुळे बाधित होणारे भूमीपुत्र देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी दि.30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ..

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे होणार उद‌्घाटन- मंत्री मंगलप्रभात लोढा राज्यातील ७५ हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

विशेष सहाय्य योजना लाभार्थ्यांना आधार अद्यावतीकरणाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्य क्रीडा दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यात-विविध क्रीडा उपक्रम राबविण्याचे आवाहन

आज दिनांक २५ जुलै २०२५ रोजी भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे.❗

खरीप हंगामासाठी खते, बी-बीयाणे वितरणाचे काटेकोरपणे नियोजन करावे – मंत्री नरहरी झिरवाळ जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक