vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

भूमीपुत्रांवर अन्याय होऊ न देता विकास करणे,ही शासनाची भूमिका आहे-परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक

भूमीपुत्रांवर अन्याय होऊ न देता विकास करणे,ही शासनाची भूमिका आहे-परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक

मुंबई: प्रतिनिधी) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) माध्यमातून ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या विकास कामांमध्ये बाधित होणाऱ्या भूमिपुत्रांवर अन्याय होऊ न देता विकास केला जाईल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी केले. ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असलेल्या विविध विकास कामाच्या आढावा बैठकी प्रसंगी बोलत होते. यावेळी एम. एम. आर.डी.ए. चे आयुक्त संजय मुखर्जी अतिरिक्त आयुक्त अश्विन मुद्गगल तसेच मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये मोघरपाडा कार डेपो मध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नसंदर्भात चर्चा झाली. तसेच गायमुख ते फाऊंटन व गायमुख ते दहिसर चेक नाका दरम्यान होणाऱ्या 60 मीटर लांबीच्या रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बरोबर देखील प्रशासनाने चर्चा केली. यामध्ये संबंधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे! तसेच रस्त्याचे विभाजन मध्यभागापासून करण्यात यावे या प्रमुख मागण्या एम.एम.आर.डी.ए. प्रशासनाने मान्य केल्या.

याशिवाय डोंगरी कार शेड व तिथून होणाऱ्या रस्त्या संदर्भात देखील चर्चा झाली. या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी सदर रस्ता हा कमीत कमी बाधित क्षेत्रातून पर्यायी मार्गाने व्हावा अशी मागणी केली. तसेच कार शेड प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या व ख्रिश्चन समुदायाचे श्रद्धास्थान असणाऱ्या ” फातिमा माता ” तीर्थस्थळाचा सन्मान राखून त्याचा विकास करण्याचे देखील निश्चित करण्यात आले.

यावेळी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण होत असून या संबंधित पिण्याच्या पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील जास्तीत लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल, असे नियोजन करावे असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.

या बैठकीला दोन्ही महापालिकेचे अधिकारी एम.एम.आर.डी.ए.चे अधिकारी यांच्याबरोबरच प्रकल्पामुळे बाधित होणारे भूमीपुत्र देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी -मंत्री मंगलप्रभात लोढा§ जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार§ जनता दरबाराला उदंड प्रतिसाद, म्हाडा संक्रमण शिबिराचा प्रश्नही लवकरच सोडवणार.

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर आता मतदान 7 फेब्रुवारीला तर मतमोजणी 9 फेब्रुवारीला

vishwatmaklokswamivarta

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करा**कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल**विविध यंत्रणांकडून तयारीचा आढावा*

पाणी फॉउंडेशन फार्मर कप 2026 जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन वाशी चौकातील अश्वारूढ शिवपुतळ्यास वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण‘जय शिवाजी – जय भारत’ पदयात्रेत नागरिकांसह मोठ्या संख्येने युवकांचा उत्साही सहभाग..

vishwatmaklokswamivarta

जिजाऊ संस्थेकडून पिवळी केंद्रातील ९ शाळांमधील १,०५० विद्यार्थ्यांना ३,१०० मोफत वह्यांचे वितरण