vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 17 फेब्रुवारीला

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 17 फेब्रुवारीला

 

     सांगली, प्रतिनिधी: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली व लठ्ठे पॉलिटेक्निक सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” सोमवार, दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता लठ्ठे पॉलिटेक्निक, एमआयडीसी, कुपवाड, सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 या मेळाव्यात 500 पेक्षा अधिक पदाकरिता जिल्ह्यातील नामांकित अशा 12 पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग असणार आहे. दहावी, बारावी, आय. टी. आय., डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट या प्रकारची शैक्षणिक पात्रता असणाऱ्या आणि सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी विविध पदांकरिता, विविध उद्योजकांकडे प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटद्वारे आपला ऑनलाईन सहभाग नोंदवावा.

सोमवार, दिनांक 17 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मुलाखतीस येताना उमेदवारांनी त्यांची सर्व मूळ कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो आणि बायोडाटाच्या किमान तीन प्रती सोबत घेऊन याव्यात. रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली या कार्यालयाशी 0233-2990383 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे.00000

संबंधित पोस्ट

कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत पाणी उपसा बंदी

एसटी महामंडळ आणि एसटी कामगारांचे मूलभूत प्रश्न मार्गी लागले पाहिजेत अशी राज्य शासनाची भूमिका असून राज्य शासन एसटी कामगारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार

छठ पूजेनंतर प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी भारतीय रेल्वे सज्ज, सणासुदीनंतर कामाच्या ठिकाणी परतणाऱ्या प्रवाशांकरता 6,181 विशेष गाड्या

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 27.72 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 11400 क्युसेक्स तर वारणा धरणातून 4060 क्युसेक्स विसर्ग सुरू

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सप्टेंबर महिन्यात पहिले विमान घेणार “टेक ऑफ”**जगातील सर्वात जलद “बॅग क्लेम” प्रणाली होणार कार्यान्वित-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

माध्यमांनी समाजाचे वैचारिक नेतृत्व करावे- संचालक हेमराज बागुल