vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत पाणी उपसा बंदी

कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत पाणी उपसा बंदी

सांगली, प्रतिनिधी : कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुरवणे अत्यावश्यक असल्याने सातारा व सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 मधील कलम 11 व 49 मधील तरतुदीनुसार गुरुवार, दिनांक 04 जून 2026 रोजीच्या 00 वाजलेपासून ते रविवार दिनांक 07 जून 2026 रोजीच्या 24 वाजेपर्यंत शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या व बिगर सिंचन (औद्योगिक कारणास्तव) सर्व योजनांचे पाणी उपसा बंदी करण्यात येत असल्याचा उपसा बंदी आदेश सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी निर्गमित केला आहे.

या कालावधीमध्ये पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांव्यतिरीक्त इतर कारणासाठी (खाजगी) कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास सदर उपसा अनधिकृत समजून, संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधीकरिता रद्दबातल करण्यात येऊन, उपसा संच सामुग्री जप्त करुन पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, धरणातील मर्यादित पाणी साठ्याचा विचार करुन बिगरसिंचन पाणी वापरकर्त्यांनी सांडपाणी/औद्योगिक वापरातील पाणी, थेट नदीत सोडून पाणीसाठा प्रदूषित करु नये. प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्याने सर्व संबंधितांनी याची दक्षता घेवून पाणीनाश टाळण्यास सहकार्य करावे, आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, सोमवार, दिनांक 08 जून 2026 रोजीच्या 00 वाजलेपासून ते गुरूवार दिनांक 11 जून 2026 रोजीच्या 24 वाजेपर्यंत उपसा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत भव्य मॅरेथॉन व वॊकेथॉन रॅलीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

चोपडा शहरातील बांधकामासाठी ०.४५ मीटर उंचीची तरतूद लागू करण्यात येणार- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta

एआय’ च्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा- अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा

vishwatmaklokswamivarta

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत शिक्षकांची दोन दिवसीय कार्यशाळा नवी मुंबईत संपन्न…

मोंथा चक्रीवादळासह अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाऱ्याची दिशा बदलत असल्यानं सतर्क राहा! वादळी वाऱ्यांचा परिणाम समुद्रापासून; मुंबईपासून विदर्भापर्यंत कधीही कुठंही सुरू होणार धुवाधार पाऊस..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला बळ