vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

शेतकरी व सर्वसामान्यांना निराश करणारा अर्थसंकल्प : जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

शेतकरी व सर्वसामान्यांना निराश करणारा अर्थसंकल्प : जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

 

जालना प्रतिनिधी : आज राज्य सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य व शेतकर्‍यांची दिशाभूल व निराश करणारा असल्याची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी दिली. प्रतिक्रियेत पुढे म्हटले आहे की, निवडणुकीपूर्वी महायुतीच्या वतीने राज्यातील जनते समोर मोठ मोठ्या घोषणा केल्या. लाडक्या बहिणींना त्यांचे मानधन एकविसशे रुपये करण्याचा शब्द दिला. तरुण बेरोजगारांसाठी उद्योगधंदे व नोकर्‍यांची हमी दिली होती. परंतु प्रत्यक्षात आज अर्थसंकल्पामध्ये यावर कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. तसेच शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणाही हवेत विरली असल्याचे दिसते. नवीन रोजगार निर्मितीसाठी कोणतेही ठोस कार्यक्रम नाहीत. शेतीमालालाही हमी भाव जाहीर केले नाहीत. अशा प्रकारे हा अर्थसंकल्प शेतकरी, सर्व सामान्य नागरिक व तरुणांची दिशाभूल करणारा असल्याचे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी व्यक्त केले.

संबंधित पोस्ट

बीड जिल्ह्यातील  सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार 80 दिवसांमध्ये आरोपपत्र पोलिसांकडून दाखल –

सीएमआरसी’ अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणार – महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

भाजपा जिल्हा कार्यालयात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व लोकनेते रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची आरती मंगलमय वातावरणात संपन्न

vishwatmaklokswamivarta

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रयागराज महाकुंभवर काय म्हणाले ते पहा वादग्रस्त विधान..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट,आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनाने एन.डी.आर.एफ आणि एस.डी.आर.एफ यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी यांचा अर्ज दाखल. 

vishwatmaklokswamivarta