vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात रेव पार्टीचे आयोजन होणार नाही यासाठी पोलीसांनी दक्षता घ्यावी**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

*जिल्ह्यात रेव पार्टीचे आयोजन होणार नाही यासाठी पोलीसांनी दक्षता घ्यावी**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

 

सातारा प्रतिनिधी: सातारा जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी शासन व प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जिल्ह्यात रेव पार्टी होणार नाही याची दक्षता घेऊन पोलीस विभागाने जिल्ह्यातील चेक पोस्टवर वाहनांची तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नार्को कोऑर्डीनेशन सेंटर समितीच बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, पोलीस उपअधीक्षक (गृह) अतुल सबनीस, राज्य गुप्त वार्ता विभागाचे सहायक आयुक्त योगेश शिंदे, अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक व्ही.व्ही. पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

काही औषधांचा वापर नशेसाठी केला जातो, अशी औषधे कोणत्या भागात जास्त विकली जात आहेत याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने घ्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, याबाबत सविस्तर माहिती सादर करावी. अवैध्यरित्या गांजा व अफूची शेती होणार नाही याची पोलीस विभागाने खबरदारी घ्यावी. तसेच अंमली पदार्थांमुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत महाविद्यालयांमध्ये जनजागृती करावी.

 जिल्ह्यातील मोठे हॉटेल, लॉज यांची पोलीस विभागाने वेळोवेळी तपासणी करावी व अंमली पदार्थ आढळल्यास त्वरीत गुन्हे दाखल करावे. अंमली पदार्थांची विक्री होणाऱ्या ठिकाणी अचानक धाडी टाकाव्यात, जास्तीत जास्त गुन्हे दाखल करावेत. पोलीस विभागाने ड्रग पडकल्यानंतर त्याच्या तपासणीसाठी यंत्रसामुग्री जिल्हा वार्षिक योजनेतून खरेदी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत दिले.

0000

संबंधित पोस्ट

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गणेश चतुर्थी तसेच गणेशोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

vishwatmaklokswamivarta

ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी” (DEAF) बाबत बँकांकडून विशेष मोहिमेचे आयोजन,दावा न केलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठ ठाणे जिल्ह्यातील 11 लाख 38 हजार 421 खातेदारांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात दि.10 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

परभणीच्या पुरातत्व वारशाचे संवर्धन करून जागतिक स्तरावर नेणार– राज्यमंत्री तथा परभणी पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

जप्त व बेवारस वाहनांचा १२ एप्रिल रोजी लिलाव

मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठे यश! मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सरकारने खालील महत्त्वाचे निर्देश दिले आहेत

vishwatmaklokswamivarta