vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

पावसाळ्यात जलजन्य आजार टाळण्यासाठी खबरदारी घ्या !!

पावसाळ्यात जलजन्य आजार टाळण्यासाठी खबरदारी घ्या !!

 आरोग्य प्रतिनिधी बुलडाणा, : जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे वातावरणात बदल होऊन वेगवेगळे जलजन्य व कीटकजन्य याचे प्रमाण वाढवून साथीचे आजार होण्याची शक्यता आहे. यासाठी नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छते बरोबर फळे, पालेभाज्या मिठाच्या पाण्यात धुवावीत तसेच प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते सर यांनी केली आहे.

सध्याचे वातावरण हे जीव जंतूसाठी पोषक आहे. त्यामुळे जंतुसंसर्ग होऊन साथीचे आजार लवकर पसरतात. पावसाळ्यात ताप, सर्दी, खोकला, अतिसार, जुलाब, हिवताप डेंगू, चिकणगुण्या, स्वाईन फ्लू, कावीळ, कॉलरा असे आजार होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात सांधेदुखी, अस्थमा आमवात, पचनाचे आजार आम्लपित यासारख्या जुनाट व्याधी देखील होतात. म्हणून योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास आजाराची तीव्रता कमी अधिक प्रमाणात जाणवते.

मान्सूनपूर्व पाऊस असला तरी गावांमध्ये पाणीपुरवठा होत असतांना गढूळ पाणी ही येऊ शकते. अशावेळी तुरटीचा वापर करावा ताप, सर्दी, खोकला याची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. त्यासाठी शासकीय रुग्णालयात तपासण्या मोफत होतात. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. जेणेकरून डासाची निर्मिती होणार नाही. घरी सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांना सर्वेक्षणासाठी मदत करावी.

पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे, पिण्याच्या पाण्यामध्ये मेडिक्लोरचा वापर करावा. रस्त्यावरील उघडे पदार्थ व शिळे अन्न खाऊ नये. गटारीत साचलेले पाणी वाहते करावे, जुने टायर नारळाच्या करवंट्या याची विल्हेवाट लावावी. पाण्याच्या टाक्या, कुलर फ्रिज यामध्ये साठलेले पाणी काढून स्वच्छ करावीत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

एक हात मदतीचा’, गुरुवार  पासून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मिळणार मदत..

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर येथील गहू गेरवा संशोधन केंद्राच्या अतिथीगृहाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याहस्ते भूमिपूजन

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनामहाडीबीटी पोर्टलचे काम पूर्ण होताच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला होणार सुरुवात ..

vishwatmaklokswamivarta

बिनागुंडा परिसरात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची संयुक्त क्षेत्रभेट,जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर बिनागुंडा परिसरात योजनांच्या अंमलबजावणीला गती वनपट्टेधारकांना फार्मर आयडी, घरकुल व विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन..

राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती ‘जिल्हा नियोजन’मधून ४५८ कोटी रुपयांची तरतूद – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रोयान्स बंधारा, जेट्टी बांधणे व नौकानयन मार्गातील गाळ काढणे हा महत्वाकांक्षी प्रकल्प -मत्स्यव्यवसाय बंदरे मंत्री-नितेश राणे