बुलडाणा, प्रतिनिधी: सामान्यतः मान्सून देशात 7 जूनपासून दाखल होतो. मात्र, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांच्या माहितीनुसार यावर्षी मान्सून 1 जूनपासूनच सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील खबरदारीचे उपाय अवलंबणे आवश्यक आहे.
खबरदारीचे उपाययोजना : पावसादरम्यान आणि वीज चमकत असताना घराबाहेर जाणे टाळा. स्वतःच्या आणि आपल्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी खालील मोबाईल अॅप्सचा वापर करा.> दामिनी अप- वीज पडण्याच्या घटनांपासून संरक्षण करण्यासाठी उपयोगी.> मेघदूत अप – हवामान आधारित शेती व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त.> सचेत अप – आपल्या स्थानानुसार आपत्तीपूर्व सूचना मिळवण्यासाठी मदत करते> भुकंप अप: भूकंप होण्यापूर्वी सूचना देणारे अॅप.
आपत्तीजन्य परिस्थिती टाळण्यासाठी व सुरक्षित राहण्यासाठी वरील अप्स आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्यांचा वापर करावा. सर्व नागरिक व शेतकऱ्यांनी सजग राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार यांनी केले आहे.