vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करताना काळजी घ्यावी;जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

शेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करताना काळजी घ्यावी;जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी) : शेतीतून अधिकाधिक उत्पादनासाठी निविष्ठांची (बियाणे, खते व किटकनाशके) गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांनी निकृष्ट, भेसळयुक्त अथवा अनधिकृत उत्पादनांपासून बचाव करण्यासाठी बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करताना काळजी घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

बियाणे, खते व किटकनाशके फक्त अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावे. दर्जा व गुणवत्ता हमीसाठी सरकारने मान्यता दिलेल्या विक्रेत्यांकडूनच निविष्ठा खरेदी कराव्यात, खरेदीची पावती घेणे आवश्यक असून विना पावती खरेदी केल्यास तक्रार करण्याचा हक्क नाकारला जाऊ शकतो म्हणून बियाण्याचे पाकिट सिलबंद, लेबलयुक्त व मोहरबंद असावे. पिशवी, टँग आणि पावती पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी, बियाणे व किटकनाशके खरेदी करताना त्यांच्या वापरण्याच्या अंतीम मुदतीची खात्री करावी, किंमत व वजनात फसवणूक टाळा, छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री अथवा कमी वजन दिल्यास त्वरित कृषि विभागाशी संपर्क साधावा. शंका आल्यास त्वरित तक्रार नोंदवा. कोणतीही तक्रार असल्यास तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किंवा कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. एच.टी.बी.टी./बीटी-3 चोर बियाण्यांपासून दूर राहा, अनधिकृत बीटी बियाणे खरेदी करू नये. शिफारस केलेल्या तणनाशकांचा वापर मान्यता प्राप्त बियाण्यांसाठीच शिफारस केली असल्यास तणनाशकांचा वापर करावा. भेसळ, बनावट उत्पादने असल्यास तसेच याबाबत अनधिकृत विक्रीबाबत माहिती मिळाल्यास शेतकऱ्यांनी कृषि विभागास तात्काळ कळवावे.

शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केल्यास उत्पादनात वाढ होऊन आर्थिक नुकसान टाळता येईल. शेतीच्या सुरक्षिततेसाठी आणि शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

सैनिकी मुलांच्या वसतीगृहात चौकिदार पदासाठी 20 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार-राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

vishwatmaklokswamivarta

वरंध घाट 30 सप्टेंबर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनाचा स्टेट बॅंकेच्या सहकार्याने उपक्रम;जि.प.शाळांमधील तीन हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तकांचे मोफत वाटप..

vishwatmaklokswamivarta

शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध

vishwatmaklokswamivarta

राज्यातील ४ हजार ५३७ रुग्णालयांमध्ये २ हजार ३९९ मोफत उपचारांचा ऑनलाइन पद्धतीने शुभारंभ