vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यात “धरती आभा” अभियानांतर्गत ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये बँकांमार्फत वित्तीय साक्षरता शिबिरांचे आयोजन

ठाणे जिल्ह्यात “धरती आभा” अभियानांतर्गत ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये बँकांमार्फत वित्तीय साक्षरता शिबिरांचे आयोजन

ठाणे, प्रतिनिधी- ठाणे जिल्हा प्रशासनाच्या “धरती आभा” अभियानांतर्गत आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांसाठी वित्तीय साक्षरता शिबिरे आयोजित करण्यात आली. ही शिबिरे राहूर, मेंडे, मोहप, दहिवली, नेवाडे इत्यादी विविध ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये पार पडली. ३० जून पर्यंत विविध ग्रामपंचायतीमध्ये ही शिबिरे घेतली जातील.

  या शिबिरांमध्ये आदिवासी समाजातील नागरिकांना बँकिंग सेवा, बचत खात्याचे महत्त्व, डिजिटल व्यवहार, तसेच सरकारी सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती देण्यात आली. विशेषतः खालील उपक्रम राबविण्यात आले…..• नव्याने बचत खाती उघडली गेली(प्रधानमंत्री जनधन योजनेत)• प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) मध्ये नोंदणी• प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) मध्ये नोंदणी  बँकांचे प्रतिनिधी आणि आर्थिक साक्षरता सल्लागार यांच्या सहभागातून जागेवरच बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या गेल्या. त्यामुळे नागरिकांनी थेट लाभ घेतला.  या शिबिरांना आदिवासी महिलांचा, युवकांचा आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बँकिंग क्षेत्रावरील विश्वास वाढण्यास मदत झाली. गावातील विविध योजनांविषयीची माहिती व शंका निरसन यासाठीही ही शिबिरे प्रभावी ठरली.  “धरती आभा” अभियानामार्फत ठाणे जिल्हा प्रशासनाचे सर्वसमावेशक आणि तळागाळातील सक्षमीकरणाचे ध्येय जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अभिषेक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विविध राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक आणि त्यांचे कर्मचारी या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून अधिक बळकट होत आहे.

00000000000

संबंधित पोस्ट

शिवशक्ती आश्रम येथे भव्य नेत्र तपासणी शिबीर संपन्न

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा निवडणूक 2025-2026 करिता मतदान अधिका-यांच्या प्रशिक्षणास नेरुळ विभागापासून प्रारंभ-प्रशिक्षणास गैरहजर कर्मचा-यांवर कायदेशीर कारवाई

कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा काळा घोडा परिसरात संगम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काळा घोडा आर्ट एवेन्यू सुशोभीकरण कामांचे लोकार्पण

अपीलकर्त्याच्या गैरवर्तणुकीमुळे तीन वर्षे सुनावणीस बंदी-राज्य माहिती आयुक्तांचे आदेश

4 सप्टेंबरला पोलिस पाटील भरतीसाठी आरक्षण सोडत

vishwatmaklokswamivarta

कल्याण प्रकरणात मोठा ट्विस्ट! तरुणाने मारहाण करण्याआधी रिसेप्शनिस्टनेच -आरोपीच्या वहिनीला थोबाडीत मारली असल्याचे समोर आले…