vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत बांधकाम कामगारांना “गृहउपयोगी वस्तू संच” निशुल्क्‍ वाटप

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत बांधकाम कामगारांना “गृहउपयोगी वस्तू संच” निशुल्क्‍ वाटप

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी– महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे लाभवाटप करण्यात येते. सर्व कामकाज हे www.mahabocw.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन प्रणालीद्वारे निशुल्क करण्यात येते.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदीत जिवीत, सक्रीय कामगारांना मे.मफतलाल इंडस्ट्रीज लि. मुंबई या संस्थेच्या वितरण केंद्रावर गृहपयोगी संचाचे वाटप करण्यात येते. संच कुटुंबातील (पती / पत्नी) करीता एकच अनुज्ञेय राहणार आहे. गृहपयोगी संचाचे वाटप मंडळाच्या दि.30 जून 2025 रोजीच्या आदेशान्वये निश्चित दिनांक भेट पद्धत Appoinment System नुसार होणार असून मंडळाच्या http://hikit.mahabocw.in/appointment या संकेतस्थळाला भेट देऊन लाभार्थ्यांनी अपाईटमेंट घेऊन संच मिळवण्यासाठी संच वाटपाचा दिनांक व वितरण केंद्र याची निवड करावी. कामगाराने त्याने निवडलेल्या दिनांकास मंडाळोच ओळखपत्र अथवा आधार कार्ड व नियुक्ती पत्र घेऊन निवडलेल्या वितरण केंद्रावर उपस्थित राहिल्यानंतर ऑनलाईन प्रणाली प्रक्रियेनंतर कामगारांना प्रत्यक्ष संच ताब्यात देण्यात येईल.

वाटप पूर्णत : निशुल्क असून कोणत्याही एजंट, संघटना अथवा त्रयस्थ व्यक्ती यांच अमिषाला व दबावाला बळी पडू नये व त्यांचेशी कोणतेही आर्थिक व्यवहार करु नये. कोणत्याही व्यक्ती कडून नोंदणी, नुतनीकरण व लााभासाइी पैशाची मागणी केल्यास त्यांचे विरोधात जवळचे पोलीस स्टेशन व या कार्यालयास तक्रार दाखल करावी असे आवाहन सहायक कामगार आयुक्त ग.भा.बोरसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

संबंधित पोस्ट

विद्यार्थ्यांमुळेच समाज व देशाचा भविष्यकाळ उज्वल- महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुपम घुगे- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा केला गुणगौरव

श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले

vishwatmaklokswamivarta

आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठीविविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे- राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य; नाणेघोळ येथील ६७ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर डोंगराला भेगा पडल्याचे निदर्शनास येताच प्रशासनाची तत्पर कार्यवाही..

नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ जालना शहरात भव्य महिला रॅली,महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – शुभांगी देशपांडे

तलावातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करू नये – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड