vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील धारावी भागात आषाढी एकादशी निमित्ताने संत कक्कया मार्गावर सामाजिक संस्थाची पायी दिंडी आणि फराळाचे वाटप…

मुंबईतील धारावी भागात आषाढी एकादशी निमित्ताने संत कक्कया मार्गावर सामाजिक संस्थाची पायी दिंडी आणि फराळाचे वाटप…

मुंबई प्रतिनिधी-मुंबईतील धारावी भागात आषाढी एकादशी निमित्ताने संत कक्कया मार्गावर सामाजिक संस्थाची पायी दिंडी आणि फराळाचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन झेंडा ग्रुप धारावी आणि विभागातील सामाजिक कार्यकर्ते तसेच विठ्ठल भक्तांनी विठू रायाच्या नाम घोषात दिंडी पदयात्रा काढून भक्तांना फराळ वाटून संपन्न झाली

झेंडा ग्रुप ऑफ धारावी यांच्या वतीने रविवार दिनांक 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी निमित्ताने संत कक्कया मार्गावरील नवीन चाळ लक्ष्मी मंदिर येथून पेरियर स्वामी चौक कामराज स्कूल 90 फूट रोड संसार हॉटेल खंबा देव रोड विठ्ठल मंदिर आणि धारावी काळा किल्ला संत रोहिदास मंडळ विठ्ठल मंदिर या परिसरात विठू नामाचा गजर करत पायी दिंडी व सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेऊन एकात्मतेचे भावनेने सर्व धर्म समभाव जपत सकाळी साडेदहा ते दीड या वेळात दिंडी पूर्ण केली यावेळी धारावी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू बिडकर यांनी या दिंडीतील वारकऱ्यांना संसार हॉटेल नाक्यासमोर शुभेच्छा दिल्या तसेच खंबा देव विठ्ठल मंदिर व काळा किल्ला येथील मंदिरात मुक्तपणे दर्शन घेतले त्यावेळी श्री गणेश खाडे व सुनील खाडे यांनीही वारकऱ्यांचे कौतुक करून आभार मानले, कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी झालेल्या सर्व भाविकांना लक्ष्मी मंदिर नवी चाळ येथे झेंडा ग्रुपच्या वतीने उपवासाचा फरक वाटप करण्यात आला

या सामाजिक संदेश देणाऱ्या पायी दिंडी मध्ये धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत यांच्याही सदस्यांनी सहभाग घेतला होता अशी माहिती श्री विष्णू कटके व दिलीप गाडेकर यांनी दिली

संबंधित पोस्ट

जिल्ह्याची ७०.६६ टक्के मतदार गणनापत्र डिजिटायझेशन;• खामगाव विधानसभा मतदारसंघ अव्वल• गृहभेटीची मोहीम ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र शासनाचे ९ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र हे देशाचे वित्तीय इंजिन असून, राज्याचा समावेशक व प्रगतीशील विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीच्या समन्वयातून महाराष्ट्र अधिक समृद्ध होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या संजय घाडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, ११ फेब्रुवारीला होणार निवड.

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्हयातील अनुकंपा उमेदवारांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते 4 ऑक्टोबर रोजी नियुक्ती आदेश वितरण*

मिरवणुक मार्गावरील खड्डे बुजवा – शहरप्रमुख दुर्गेश काठोठीवाले

vishwatmaklokswamivarta