vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू

जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू

गडचिरोली, प्रतिनिधी : छत्तीसगड राज्यातील अबुजमाड परिसरात २७ माओवाद्यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर माओवादी संघटनांनी ११ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान स्मारक सभा व आंदोलनांचे आवाहन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १० जुलै रोजी मध्यरात्रीपासून २४ जुलैच्या रात्रीपर्यंत जमावबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अंतर्गत शस्त्रे, दगड, स्फोटके, भडकाऊ साहित्य बाळगणे, घोषणा करणे, सभा घेणे, पाच किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, मिरवणुका काढणे यावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कोणतीही आंदोलनात्मक कृती करण्यासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे..सदर जमावबंदी आदेश गडचिरोली जिल्ह्याच्या संपूर्ण क्षेत्रात लागू राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

ॲग्री हॅकॅथॉन’च्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ आयोजित कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

भुसावळ शहरातील गर्दीच्या ठिकाणी पोलीस बळ वाढविणार- गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत साहित्य उपलब्ध

केंद्र सरकारकडून एकीकृत निवृत्ती वेतन योजना (यूपीएस) पेन्शन योजनेची अधिसूचना जारी

vishwatmaklokswamivarta

सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढ

बांगलादेशी घुसखोर हद्दपारीसाठी पुण्यात हिंदू संघटनांचा विराट मोर्चा !**शेवटचा बांगलादेशी भारताबाहेर जाईपर्यंत हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे आंदोलन चालू राहणार !* 

vishwatmaklokswamivarta