vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू

जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू

गडचिरोली, प्रतिनिधी : छत्तीसगड राज्यातील अबुजमाड परिसरात २७ माओवाद्यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर माओवादी संघटनांनी ११ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान स्मारक सभा व आंदोलनांचे आवाहन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १० जुलै रोजी मध्यरात्रीपासून २४ जुलैच्या रात्रीपर्यंत जमावबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अंतर्गत शस्त्रे, दगड, स्फोटके, भडकाऊ साहित्य बाळगणे, घोषणा करणे, सभा घेणे, पाच किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, मिरवणुका काढणे यावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कोणतीही आंदोलनात्मक कृती करण्यासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे..सदर जमावबंदी आदेश गडचिरोली जिल्ह्याच्या संपूर्ण क्षेत्रात लागू राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी तरुणांना मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी..

दावा न केलेली रक्कम खातेदारांना देण्यासाठी बँकांनी जनजागृती करावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दावा न केलेली रक्कम खातेदारांना परत देण्यासाठी महामेळावा संपन्न- ⁠आतापर्यंत ३३४ खातेदारांना ३९ लाखांचा लाभ..

vishwatmaklokswamivarta

27 ते 30 सप्टेंबर कालावधीत पाठ्यपुस्तक मंडळांची सर्व व्यवहार बंद

vishwatmaklokswamivarta

जालन्यातील लक्कडकोट येथील जमीन वादाने पेटले रान; जयश्री कटके यांच्याकडून पोलीस व राजकारण्यांवर गंभीर आरोप

शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी पीक कर्ज नूतनीकरण करून घ्यावे – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

आताची मोठी बातमी. कोकणातील, चिपळूण मध्ये पिंपळी कॅनॉल च्या पुलावर रीक्षा,थार आणि ट्रक अपघात एकूण चार ठार