vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

13 ते 15 ऑगस्ट कालावधीत हर घर तिरंगा अभियान* जिल्हाधिकारी संतोष पाटील* 

13 ते 15 ऑगस्ट कालावधीत हर घर तिरंगा अभियान* जिल्हाधिकारी संतोष पाटील*

सातारा प्रतिनिधी: हर घर तिरंगा हे अभियान सातारा जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यामध्ये विविध घटकांनी उत्साहाने व उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हे अभियान राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे

  जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय व निमशासकीय संस्था, महामंडळे, शासकीय व खाजगी इस्पीतळे व सार्वजनिक आस्थापना व खाजगी आस्थापनांची कार्यालये, कारखाने व दुकाने इत्यादी ठिकाणी तीन दिवसाच्या कालावधीत राष्ट्रध्वज यथोचित सन्मानाने फडकवण्यात यावा.

राष्ट्रध्वज सन्मानाने फडकविताना राष्ट्रगीत व राज्यगीत गावून राष्ट्रध्वजास सलामी देण्यात यावी. तसेच राष्ट्रध्वज संहितेचे पालन करावे. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी. दि. १३, १४ व १५ ऑगस्ट २०२५ या दरम्यान सुर्योदयानंतर राष्ट्रध्वज फडकवणे व सुर्यास्तापुर्वी राष्ट्रध्वज उतरविणे बंधनकारक राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.

0000

संबंधित पोस्ट

घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी दक्षता व फिरत्या पथकांचा पहारा

डॉ बाबासाहेब आंबेडकर संकल्प भूमी स्मारक कामाची केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी* 

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांच्या अडचणींवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढावा -जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प व अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित प्रश्नांवर चर्चा

नैसर्गिक आपत्ती संदर्भात पालकमंत्री यांनी घेतला आढावा; प्रशासनाला तत्काळ मदतीचे निर्देश– ना. मकरंद पाटील

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत १७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान विशेष उपक्रम

vishwatmaklokswamivarta

माणगाव तालुक्यातील खरबाची आदिवासी वाडीत जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट; ग्रामस्थांशी थेट संवाद