माणगाव तालुक्यातील खरबाची आदिवासी वाडीत जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट; ग्रामस्थांशी थेट संवाद
रायगड प्रतिनिधी- जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी माणगाव तालुक्यातील गांगवली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खरबाची आदिवासी वाडीला सदिच्छा भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिनव “संवाद सेतू अर्थात हितगुज” उपक्रमांतर्गत खरबाची वाडी आदिवासी वाडीतील नागरिक, आणि विविध विभागांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद होता
तसेच “जनजातीय गरिमा दिवस” आणि “सबसे दूर, सबसे पहले” अभियानाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्यात आला. यावेळी माणगावचे उपविभागीय अधिकारी श्री. सानप, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग सौ. तेजस्विनी गलांडे, गटविकास अधिकारी सौ. शुभदा पाटील, आरोग्य अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, आरोग्य सहाय्यक तसेच विविध विभागांचे क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी वाडीतील आदिवासी बांधव, महिला आणि मुलांशी संवाद साधून त्यांच्या त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.