vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माणगाव तालुक्यातील खरबाची आदिवासी वाडीत जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट; ग्रामस्थांशी थेट संवाद 

माणगाव तालुक्यातील खरबाची आदिवासी वाडीत जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट; ग्रामस्थांशी थेट संवाद

रायगड प्रतिनिधी- जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी माणगाव तालुक्यातील गांगवली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खरबाची आदिवासी वाडीला सदिच्छा भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिनव “संवाद सेतू अर्थात हितगुज” उपक्रमांतर्गत खरबाची वाडी आदिवासी वाडीतील नागरिक, आणि विविध विभागांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद होता

तसेच “जनजातीय गरिमा दिवस” आणि “सबसे दूर, सबसे पहले” अभियानाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्यात आला. यावेळी माणगावचे उपविभागीय अधिकारी श्री. सानप, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग सौ. तेजस्विनी गलांडे, गटविकास अधिकारी सौ. शुभदा पाटील, आरोग्य अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, आरोग्य सहाय्यक तसेच विविध विभागांचे क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी वाडीतील आदिवासी बांधव, महिला आणि मुलांशी संवाद साधून त्यांच्या त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

0000

संबंधित पोस्ट

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा;परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णयशैक्षणिक संस्थांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणीदुसरी यादी 15 ऑगस्टपूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता- जिल्हाधिकारी संतोष पाटील

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

कोलवड येथे कृषी ड्रोन प्रात्यक्षिक जनजागृती शिबिर

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वीपणे राबवा – सभापती प्रा. राम शिंदे सक्षम ग्रामपंचायतींवरच महाराष्ट्राचा विकास अवलंबून – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

महिलांच्या सुयोग्य सहभागाने सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास शक्य– विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे