vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पालघरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 9 बोटी अद्याप परतल्या नाहीत …

 पालघरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 9 बोटी अद्याप परतल्या नाहीत …

मुंबई प्रतिनिधी-

 मागील 48 तासांपासून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना आणि प्रामुख्यानं समुद्रकिनारी भागांना पावसानं झोडपलं असून, पुढच्या 24 तासांसाठीसुद्धा या भागांसाठी अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरीचाही यामध्ये समावेश असून, आता पालघर जिल्ह्यातून चिंतेत भर टाकणारं वृत्त नुकतंच समोर आलं आहे.

उपलब्ध माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील मासेमारीसाठी गेलेल्या 9 बोटी अद्याप परतल्या नाहीत. तर, वसईतील 3 बोटींशी अद्यापही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळं स्थानिक मासेमारांमध्ये प्रचंड भीती आणि चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.

पालघर जिल्यातील सातपाटी बंदरातील 4 बोटी आणि खोचिवडे येथील 2 बोटींनी गुजरातच्या जाफराबाद मधील नवा बंदरात घेतला आसरा घेतल्याचं वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या एकूण 19 बोटी समुद्रात अडकल्या होत्या. यामधील 13 बोटी वसई, 2 खोचिवडे तर 4 सातपाटी बंदरातील बोटी होत्या. वसई बंदरातील 13 बोटिंपैकी बोटी 10 बोटी वसई बंदरात रात्री उशिरा परातल्या. मात्र 3 बोटी अद्याप बेपत्ता असल्याचं वृत्त आहे.

खवळलेल्या समुद्रानं धडकी भरतेय…

हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार मागील 48 तासांपासून समुद्र खवळलेल्या असून, भरतीच्या वेळी उंचच उंच लाटाही उसळत आहेत. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 65 किमी इतका असल्यानं अद्यापही समुद्रात असणाऱ्या बोटिंसाठी अनेक अडचणी उभ्या राहताना दिसत आहेत. प्रशासनाकडून तीन दिवसांपूर्वीच खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना परतण्याच्या दिल्या होत्या, मात्र असं असतानाही काही बोटींनी किनारा न गाठल्यानं आता हे संकट आणखी गंभीर होतना दिसत आहे.

संबंधित पोस्ट

गडचिरोलीत ‘आंबा महोत्सव-२०२६’ उत्साहात; स्थानिक आंबा वाणांच्या संवर्धनावर भर

राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई- कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली ।

पुण्यात सीएनजी हायड्रो टेस्टिंग दरात वाढ – रिक्षा चालक संघटनांचा आंदोलनाचा इशारा

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६लातूर जिल्ह्यात १ हजार ७४७ केंद्रांवर शनिवारी मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण-· मतदान पथके रवाना; ८ हजार ४१४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश· जिल्हा परिषदेसाठी २४२, तर पंचायत समित्यांसाठी ४१९ उमेदवार निवडणूक रिंगणात-· मतदान यंत्रावर जिल्हा परिषदसाठी पांढऱ्या, पंचायत समितीसाठी गुलाबी मतपत्रिका

vishwatmaklokswamivarta

राज्यात मॉडेल शासकीय सोलार जिल्हा स्पर्धेचे आयोजन- मंत्री अतुल सावे प्रथम विजेत्यास पाच लाखांचे बक्षीस..