vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कोयना, वारणा धरणातील विसर्ग कमी..

कोयना, वारणा धरणातील विसर्ग कमी..

             सांगली, प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वाढवलेला विसर्ग दि. 21 ऑगस्ट रोजी कमी करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी २१ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ७ फुटांवरून ४ फूट ६ इंचांपर्यंत खाली आणून ३४,६०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण ३६,७०० क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.

दरम्यान, वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी झाल्याने जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता वक्र द्वाराद्वारे सुरू असणारा विसर्ग धरणातून दिनांक 21/08/2025 रोजी सायंकाळी 6 वाजता बंद करून वक्र दरवाजे बंद करण्यात आले आहेत व विद्युत गृहातून 1630 क्युसेक विसर्ग कायम ठेऊन वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

पाऊस चालू/वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्गात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगून दोन्ही धरण व्यवस्थापनांकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी-विक्रीवर पोलिसांना माहिती देणे अनिवार्य

सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती..– सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्याचे आवाहन ग्रामपंचायत व नगर परिषद क्षेत्रातील 210 केंद्रासाठी प्रस्ताव आमंत्रित

vishwatmaklokswamivarta

जम्मू कश्मीरच्या भद्रवाह – चंबा मार्गावर खोल दरीत वाहन कोसळून झालेल्या अपघातात १० जवानांचा मृत्यू

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्र्यांनी घेतला अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा आढावा

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिबजींचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत आजपासून विविध उपक्रम- लातूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या ‘प्रभात फेरी’तून जनजागृती मोहीम

vishwatmaklokswamivarta