vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कोयना, वारणा धरणातील विसर्ग कमी..

कोयना, वारणा धरणातील विसर्ग कमी..

             सांगली, प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वाढवलेला विसर्ग दि. 21 ऑगस्ट रोजी कमी करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी २१ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ७ फुटांवरून ४ फूट ६ इंचांपर्यंत खाली आणून ३४,६०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण ३६,७०० क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.

दरम्यान, वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी झाल्याने जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता वक्र द्वाराद्वारे सुरू असणारा विसर्ग धरणातून दिनांक 21/08/2025 रोजी सायंकाळी 6 वाजता बंद करून वक्र दरवाजे बंद करण्यात आले आहेत व विद्युत गृहातून 1630 क्युसेक विसर्ग कायम ठेऊन वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

पाऊस चालू/वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्गात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगून दोन्ही धरण व्यवस्थापनांकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

00000

संबंधित पोस्ट

पाकिस्तानकडून जम्मू कश्मीरच्या पूंछमध्ये मारल्या गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नियुक्तीपत्रे दिली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन कामाला गती द्यावी* – *पालकमंत्री शंभूराज देसाई* 

शासकीय योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगली पॅटर्न ब्रँड तयार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणार- जिल्हाधिकारी अशोक काकडे सांगली जिल्हा समृध्द करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन- सांगली पॅटर्न कृषि परिषद निर्यात सक्षमीकरण कार्यशाळेस उत्कृष्ट प्रतिसाद

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घ्यावा – खासदार डॉ. नामदेव किरसान‘दिशा’ समितीची आढावा बैठक संपन्न; विकासकामांना गती देण्याचे निर्देश

ह्युंदाई मोटरच्या प्रोजेक्ट H२OPE अंतर्गत गडचिरोलीतील शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी-मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक

vishwatmaklokswamivarta