vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे कामगार व नोकरदार महिलांना मिळणार दिलासा

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,कामगार व नोकरदार महिलांना मिळणार दिलासा.

मुंबई प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची काळजी घेता यावी, यासाठी ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत “पाळणा” ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे कामगार व नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळणार असून मुलांच्या संगोपनासाठी सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पाळणाघरांमध्ये डे-केअर सुविधा, पूर्व शालेय शिक्षण, पूरक पोषण आहार, वाढीचे निरीक्षण, आरोग्य तपासणी, लसीकरण आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच मुलांना दिवसातून तीन वेळा म्हणजेच सकाळचा नाश्ता, दुपारचे गरम शिजवलेले जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता देण्यात येईल.
पाळणा घर महिन्यात 26 दिवस, दररोज 7.5 तास सुरु राहील, यामध्ये जास्तीत जास्त 25 मुले असतील. याठिकाणी एक पाळणा सेविका व एक पाळणा मदतनीस नेमण्यात येईल. वीज, पिण्याचे पाणी, बालस्नेही शौचालय यांसारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत.
या कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविका यांना ₹1500 प्रतिमाह भत्ता देण्यात येणार आहे. अंगणवाडी मदतनीस यांना ₹750 प्रतिमाह, पाळणा सेविका मानधन यांना ₹5500 प्रतिमाह, तर पाळणा मदतनीस यांना ₹3000 प्रतिमाह भत्ता देण्यात येणार आहे.

—– 000 —-

संबंधित पोस्ट

सांगली आंबा महोत्सवास प्रचंड प्रतिसाद,३३.६० लाखाची उलाढाल..

मोटार वाहन निरीक्षकांचा जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीचा शिबिर दौरा 

निती आयोगाच्या शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट· ‘सिंधुप्रहरी’ कार्यप्रणाची घेतली माहिती· परिवहन विभागानेही केले सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तसेच भीमा व सीना नदीला सुरू असलेल्या विसर्गामुळे पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर,सोलापूरच्या मदतीसाठी ५ यांत्रिक बोटी रवाना….

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा जिल्ह्यात 45 नवीन आधार सेवा केंद्रांची स्थापना होणार;13 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

बनावट खतांविरोधात राज्यांनी कठोर पावले उचलावीतकेंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र