vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मिरा रोडच्या नयानगर परिसरातील नूरजहान इमारतीत भीषण दुर्घटना मजल्यावरचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर कोसळला, 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, मिरा रोडमधील दुर्दैवी घटना…

मिरा रोडच्या नयानगर परिसरातील नूरजहान इमारतीत भीषण दुर्घटना मजल्यावरचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर कोसळला, 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, मिरा रोडमधील दुर्दैवी घटना…

 

मिरा रोड प्रतिनिधी –

मिरा रोडच्या नयानगर परिसरातील नूरजहान इमारतीत भीषण दुर्घटना घडली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळून थेट दुसऱ्या मजल्यावर कोसळला. या घटनेत एक चार वर्षीय निरागस बालक जागीच ठार झाला तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सुमारे चाळीस वर्षे जुनी असलेली ही इमारत आधीपासूनच जीर्ण अवस्थेत होती. घटनेनंतर प्रशासनाने तातडीने इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या घटनेनंतर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत, इतकी जुनी व धोकादायक स्थितीत असलेली इमारत वेळीच का रिकामी करण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
महानगरपालिकेने ही इमारत धोकादायक घोषित करून नागरिकांना सुरक्षितपणे हलवण्याची कार्यवाही आधीच का केली नाही? जर असे केले असते, तर एका चार वर्षांच्या निष्पाप जीवाचा बळी गेला असता का? असे प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत.

या घटनेने नयानगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागरिकांचा संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या दुर्लक्षावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडून जिल्हा परिषद शाळांची तपासणी; मूलभूत सुविधा व सुरक्षा उपायांची पाहणी

महिला व बालविकास मंत्रालयाकडून ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’साठी अर्ज आमंत्रितअर्ज स्वीकारण्यास 1 एप्रिल 2025 पासून सुरुवात, अंतिम मुदत 31 जुलै 2025

vishwatmaklokswamivarta

मुलुंडमध्ये मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळला, ऑटोवर ढिगारा पडल्याने ३-४ जण जखमी झाल्याचा संशय एकाचा मृत्यू झाल्याची वृत्त

vishwatmaklokswamivarta

पारपत्र अर्जामध्ये दिलेल्या पत्त्याची चोख पडताळणी करणार-गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम

महिला सक्षमीकरणासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्नशील रहावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील मृत पावलेल्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांना डोंबिवलीत हजारो शोकाकुल नागरिकांनी भगशाला मैदानात एकत्रित येत अश्रूंच्या साक्षीने अखेरचा निरोप दिला.