vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्य सरकारने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या तातडीने रद्द करण्याचा मोठा निर्णय…

राज्य सरकारने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या तातडीने रद्द करण्याचा मोठा निर्णय…

राज्य प्रतिनिधी -राज्य सरकारने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या तातडीने रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव व मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली आहे. मनोज जरांगे यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले असून, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ते ठामपणे आंदोलन करत आहेत. सरकारने जरांगे पाटील यांच्या समाधानासाठी काय करावे, हा प्रश्न समोर आला आहे.

ओबीसी संघटनांनीही या आंदोलनास उत्तर देत उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले आहे. आरक्षण देण्यास विरोध झाल्यास आणखी मराठा समाज मुंबईकडे येणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे मुंबईत आंदोलकांची संख्या वाढू शकते आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वाढू शकतो. त्यामुळेच राज्य सरकारने मुंबईतील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.

या आदेशानुसार सुट्टीवर असलेले, रुग्णनिवेदन, अर्जित रजा, किरकोळ रजा आणि गैरहजर पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने कर्तव्यावर रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव आणि मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मुंबईत पोलीस उपस्थिती वाढवावी लागणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी खबरदारी म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता मुंबई पोलिसांनी तत्काळ सेवेसाठी हजर राहावे लागणार आहे.

संबंधित पोस्ट

रेरा’ कायद्यामुळे महाराष्ट्रातील रियल ईस्टेट क्षेत्राला विश्वासार्हता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकास प्रक्रियेत रियल ईस्टेट क्षेत्राचा सहभाग महत्वाचा

महाराष्ट्रात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने सातत्याने राबविलेल्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्यूदरात घट…

vishwatmaklokswamivarta

महिला बचत गटांच्या उत्पादनांचे सांगलीत २८ मार्चपासून तीन दिवसीय प्रदर्शन

थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पैतृक गावी खानवडी, पुणे येथे त्यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पीक नुकसान मदतीच्या वाटपासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत शंभर दिवसात करावयाच्या कामांचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

सातारा तालुका पंचायत समिती सदस्य पदासाठी आरक्षण सोडत 13 ऑक्टोबर रोजी*

vishwatmaklokswamivarta