vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्य सरकारने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या तातडीने रद्द करण्याचा मोठा निर्णय…

राज्य सरकारने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या तातडीने रद्द करण्याचा मोठा निर्णय…

राज्य प्रतिनिधी -राज्य सरकारने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या तातडीने रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव व मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली आहे. मनोज जरांगे यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले असून, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ते ठामपणे आंदोलन करत आहेत. सरकारने जरांगे पाटील यांच्या समाधानासाठी काय करावे, हा प्रश्न समोर आला आहे.

ओबीसी संघटनांनीही या आंदोलनास उत्तर देत उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले आहे. आरक्षण देण्यास विरोध झाल्यास आणखी मराठा समाज मुंबईकडे येणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे मुंबईत आंदोलकांची संख्या वाढू शकते आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वाढू शकतो. त्यामुळेच राज्य सरकारने मुंबईतील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.

या आदेशानुसार सुट्टीवर असलेले, रुग्णनिवेदन, अर्जित रजा, किरकोळ रजा आणि गैरहजर पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने कर्तव्यावर रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव आणि मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मुंबईत पोलीस उपस्थिती वाढवावी लागणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी खबरदारी म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता मुंबई पोलिसांनी तत्काळ सेवेसाठी हजर राहावे लागणार आहे.

संबंधित पोस्ट

महाशिवरात्रीनिमित्त वेरुळ यात्रोत्सवानिमित्त वाहतुक मार्गात बदल..

vishwatmaklokswamivarta

सहकार क्षेत्रात पुरुषांसह महिलांनाही सामावून घेण्याचे शासनाचे धोरण – मंत्री बाबासाहेब पाटील सहकारमंत्र्यांच्या हस्ते ब्रम्हदेव दादा माने सहकारी बँकेच्या २२ व्या शाखेचे उद्घाटन

महाराष्ट्र शिक्षक परीक्षा पात्रता परीक्षा २०२४-राखीव निकालांची सुनावणी दि.२५ पासुन

शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय पुनर्विकास टप्पा दोनच्या रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

जिल्ह्यात 30 डिसेंबर रोजी महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने तसेच नामांकन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिनियम कलम 36 अन्वये आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अलिबाग येथे भूमि अदालतचे आयोजन

vishwatmaklokswamivarta