vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महिला बचत गटांच्या उत्पादनांचे सांगलीत २८ मार्चपासून तीन दिवसीय प्रदर्शन

महिला बचत गटांच्या उत्पादनांचे सांगलीत २८ मार्चपासून तीन दिवसीय प्रदर्शन

        सांगली, प्रतिनिधी) : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील माविमच्या महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २८ मार्च ते ३० मार्च २०२६ या कालावधीत कच्छी जैन समाज सभागृह, राम मंदिर कॉर्नर, सांगली येथे होणार आहे. सांगली शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन महिला बचत गटांच्या वस्तूंची खरेदी करावी आणि महिलांचा आत्मविश्वास वाढवावा, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळ सांगलीचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

    या प्रदर्शनामध्ये ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, कलाकुसरीच्या वस्तू, डाळी, कडधान्ये, सेंद्रिय फळे व भाजीपाला यांचा समावेश असणार आहे. या उपक्रमामागील उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी शहरी बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आहे.

       या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे पाटील, नाबार्ड सांगलीचे उपमहाव्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ तसेच जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ उपस्थित राहणार आहेत.

00000

संबंधित पोस्ट

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारांतर्गत नऊ जिल्ह्यांतील पाच हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय क्रीडा दिन सोहळा मुलांनो भरपूर खेळा; पण मैदानावर…मोबाईलवर नव्हे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

सह्याद्रीच्या कुशीत पर्यटनाचा उत्सव-पाटण येथे २ ते ६ एप्रिलदरम्यान ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’

या दिवाळीत प्रियजनांना भेट द्या फास्टटॅगचा वार्षिक पास

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ‘गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा’ आयोजित