vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, ११ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता मुंबई येथील श्री धाकलेश्वर मंदिर, महालक्ष्मी कंपाऊंड, भुलाभाई देसाई रोड, मुंबई येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात प्रसिद्ध कलाकार शुभदा वराडकर यांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून, भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरेचा समृद्ध आविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे. ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ अंतर्गत आयोजित करण्यात येणारा हा कार्यक्रम श्रद्धा, संस्कृती आणि राष्ट्रीय अस्मितेचा संदेश देणारा ठरणार आहे.

हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा गौरव आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड येथे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रमाला लाखो भाविकांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत नागरिकांचा प्रतिसाद नोंदवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची विशेष पथके*

मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त”मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी वाकोला मासळी बाजारातील कोळी भगिनींना केले आश्वस्त,मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत

महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी पंचशिल धम्म ध्वज यात्रा आज जालन्यात नागपूर ते चैत्यभुमी दरम्यान पू.भन्ते विनाचार्य साधणार जनसंवाद

महाराष्ट्रासह उत्तर भारतात कडाक्या थंडीची शक्यता -हिमाचल प्रदेश पश्चिमी विक्षोपमुळे थंडीची तीव्र लाट  अनेक ठिकाणी ताशी चाळीस ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहत असून बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लेह-लडाख, काश्मीर खोरे आणि हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी.

vishwatmaklokswamivarta

प्रगतीशील व प्रयोगशील शेतकऱ्यांशी कृषीमंत्र्यांनी साधला संवाद शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य- कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे