vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सोमठाणा खुर्द येथील जमीन मोबदल्यासाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

सोमठाणा खुर्द येथील जमीन मोबदल्यासाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

     अमरावती, प्रतिनिधी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागांतर्गत सोमठाणा खुर्द येथील वाढीव जमीन मोबदल्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.

  सोमठाणा खुर्द येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीच्या मूल्यांकनाच्या चार पट मोबदला लवकरच वितरित केला जाणार आहे. यासाठी 100 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर अर्ज, बँक खाते पुस्तकाची छायाप्रत, शेतीचा सातबारा उतारा, लाभार्थी मयत असल्यास वारस प्रमाणपत्र आणि वारसाच्या बँक पासबुकची छायाप्रत ही कागदपत्रे तातडीने सादर करणे आवश्यक आहे.

  मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव संरक्षणासाठी सोमठाणा खुर्द गावातील 42 शेतमूल्यांकनधारक आणि 21 वनहक्कधारक यांच्या जमिनींचे मूल्यांकन करण्यात आले आहे. यापूर्वी, त्यांना जमिनीच्या मूल्यांकनाच्या एक पट रक्कम आणि त्यावर 30 टक्के दिलासा रक्कम देण्यात आली होती. मात्र, 12 ऑक्टोबर 2015 रोजीच्या नवीन शासन निर्णयानुसार, भू-संपादन कायदा 2013 लागू झाला आहे. या कायद्यानुसार, जमिनीचा मोबदला पुनर्वसन पॅकेजव्यतिरिक्त दिला जातो आणि तो जमिनीच्या मूल्यांकनाच्या चार पट असणे अपेक्षित आहे. त्यामुळे, या लाभार्थ्यांना यापूर्वी मिळालेली रक्कम वगळून, उर्वरित मोबदला देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे

  यात अनेक लाभार्थ्यांनी अद्याप आवश्यक कागदपत्रे सादर केली नसल्याने मोबदला मिळण्यास अडचणी येत आहेत. त्‍यामुळे राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांना हक्काचा मोबदला तातडीने मिळणार आहे. या गावातील पात्र लाभार्थ्यांची सविस्तर यादी mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे उपवनसंरक्षक आर. एस. टोलिया यांनी यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकी रस्ता सुधारणा कामासाठी 30 जुलैपर्यंत वाहतुकीस बंद

vishwatmaklokswamivarta

राज्यासह मुंबईत अनेक शहरांमध्ये हलका ते मध्यम पाऊस सुरू

vishwatmaklokswamivarta

सणासुदीच्या काळातही विजाभज आश्रमशाळा कर्मचारी वेतनापासून वंचित आश्रमशाळा वेतनासाठी तरतूद द्या – आमदार सुधाकर अडबाले यांचे प्रधान सचिवांना निवेदन..

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार – भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या अर्जावर बैठकीत सविस्तर चर्चा  धर्मनिरपेक्षता व शहराच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा महत्त्वाचा : अरविंद चव्हाण 

vishwatmaklokswamivarta