vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुसळधार पावसामुळे शेतकरी व नागरिक हतबल,भास्कर आबा दानवे यांनी तातडीने मदतीसाठी मागणी केली

मुसळधार पावसामुळे शेतकरी व नागरिक हतबल,भास्कर आबा दानवे यांनी तातडीने मदतीसाठी मागणी केली

जालना, (प्रतिनिधी) – जालना शहर व परिसरातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि ढग फुटीमुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेतमाल नष्ट झाला, घरांची पडझड झाली, जनावरांचे प्राण गेले तसेच रस्ते आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः रात्री बारा वाजल्यापासून सुरू झालेल्या ढग फुटीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान अधिकच वाढले आहे. अनेक पूल वाहून गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जालना शहरातील सुमारे ८० टक्के भागात पाणी घरांत शिरले असून, काही ठिकाणी तीन फूटांहून अधिक पाणी घरांत भरले आहे. नागरिकांच्या घरांत सापसारखे प्राणी आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी या परिस्थितीवर तात्काळ लक्ष देण्यासाठी मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. त्यांनी पत्रात मागणी केली आहे की, जालना शहर व ग्रामीण भागातील नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांसाठी तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई देण्यात यावी. तसेच, पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांसाठी तात्पुरती निवासव्यवस्था आणि आर्थिक मदत जाहीर करावी.

या आपत्तीमुळे शेतकरी व नागरिक हतबल झाले असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने योग्य ती मदत करावी असे हि त्यांनी पत्राद्वारे सांगितले आहे

संबंधित पोस्ट

नैसर्गिक आपत्तीबाधित शेतकऱ्यांसाठी 121 कोटींच्या मदत निधीस मंजूरी- आतापर्यंत 219 कोटी 70 लाख रुपयांची मदत- पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

भिवंडी शहराच्या सर्वांगीण विकासाला मिळणार गती;ठाणे- भिवंडी-कल्याण भूमीगत मेट्रोसह नवीन उड्डाणपूल निर्मितीचा स्वतंत्र प्रकल्प राबवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणे-कल्याण- भिवंडी मेट्रो मार्ग आढावा बैठक

चला, विकसित महाराष्ट्रासाठी एकत्र काम करूया!

वर्धा जिल्ह्यात पावसामुळे पडझड – अनेक कुटुंबे बेघर

आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड, अहिल्यानगर येथे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

अमृतपेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ अभिनव संकल्पनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे खोपोली येथे आयोजन