vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

साताऱ्यात ‘रणरागिणी ताराराणी’ महानाट्याचे भव्य सादरीकरण प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध..

साताऱ्यात ‘रणरागिणी ताराराणी’ महानाट्याचे भव्य सादरीकरण प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध..

सातारा प्रतिनिधी: सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या विशेष सहकार्याने आयोजित राज्य महोत्सवानिमित्त शाहू कला मंदिर येथे ऐतिहासिक महानाट्य ‘रणरागिणी ताराराणी’ चे भव्य सादरीकरण उत्साहात पार पडले.

शाहुकला मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, तहसीलदार समीर यादव, पंकज चव्हाण यांच्यासह सातारा शहरातील प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 प्रारंभी मान्यवरांच्या श्रीगणेश पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी प्रेक्षकांशी संवाद साधून राज्य महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले.

युवराज पाटील लिखित व विजय राणे दिग्दर्शित या महानाट्यात तब्बल ५० हून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला. ताराराणींच्या शौर्यगाथेचे प्रभावी चित्रण पाहून रसिक भारावून गेले. प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सादरीकरणाला दाद दिली. तसेच याचसोबत स्थानिक कलाकारांनी सादर केलेले ‘भक्ती रेपोस्ट’ हे संगीतमय कार्यक्रम देखील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेला.

0000

संबंधित पोस्ट

कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या माध्यमातून दिव्यांगांना सेवा देऊन आत्मनिर्भर करणार – मुख्य सचिव राजेश अग्रवाल ‘दिव्यांग व्यक्तींच्या समावेशन व सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) क्षमता उलगडणे’ या विषयावर प्री-समिट राऊंडटेबलचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार दिल्लीतील महाराष्ट्र सदनात जंगी स्वागत

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर· सभापती, सदस्य पदांची आरक्षण सोडत 13 ऑक्टोबरला ; राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीने देशाची महासत्तेकडे वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमली पदार्थ संबंधी गुन्ह्यांत झिरो टॉलरन्स महत्वाचे

vishwatmaklokswamivarta

आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान – मंत्री डॉ. अशोक वुईके अभियानात पुणे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्याकरीता काम करा

सर्वसामान्यांसाठीच्या शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- पालक सचिव गोविंदराज