vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईत ओला आणि उबर आधारित टॅक्सीसेवा आता अधिक महाग होणार..

मुंबईत ओला आणि उबर आधारित टॅक्सीसेवा आता अधिक महाग होणार..

राज्य प्रतिनिधी -मुंबईत ओला व उबरसारख्या आधारित टॅक्सीसेवा आता अधिक महाग होणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने नुकतेच जाहीर केलेल्या नव्या भाडेनियमांनुसार, दिनांक १८ सप्टेंबर २०२५ पासून प्रत्येक किलोमीटरसाठीचे भाडे बावीस रुपये बहात्तर पैसे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना दैनंदिन प्रवासासाठी पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. विशेषतः रोजंदारीने कामाला जाणाऱ्या प्रवाशांवर या निर्णयाचा थेट परिणाम होणार असून त्यांच्या खर्चात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

याशिवाय, प्रवासाची मागणी जास्त असलेल्या वेळेस म्हणजे सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी, सध्याच्या भाड्यापेक्षा दीडपट भाडेवाढ करण्यास कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. उलट, मागणी कमी असलेल्या वेळेस, रात्री च्या वेळी भाड्यात पंचवीस टक्क्यांपर्यंत कपात करण्याची मुभा असेल. त्यामुळे प्रवाशांना एका दिवसातच वेगवेगळ्या वेळेस बदलणारे दर अनुभवावे लागतील. हे भाडेनियम सर्ज प्रायसिंग पद्धतीवर आधारित असून, कंपन्यांना मागणीअनुसार दर ठरवण्याची लवचिकता मिळाली आहे.या बदलामुळे कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असली तरी प्रवाशांच्या खिशाला मात्र मोठा फटका बसणार आहे. आधीच वाढलेले इंधनदर आणि वाहतूकखर्च यामुळे प्रवास महाग झालेला असताना आता अॅप-आधारित टॅक्सीभाड्यातील ही वाढ लोकांच्या आर्थिक नियोजनावर ताण आणणारी ठरेल. सरकारने केलेल्या या नव्या धोरणाचा उद्देश सेवा स्थिर ठेवणे आणि वाहनचालकांना योग्य परतावा मिळवून देणे असा असला तरी, साधारण नागरिकांसाठी ही आणखी एक महागाईची झळ ठरणार आहे.

संबंधित पोस्ट

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

नव्या भारताबरोबरच सांस्कृतिक परंपरेचा उलगडला इतिहास…सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन प्रदर्शन २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत

vishwatmaklokswamivarta

दख्खन जत्रेतून स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- दख्खन जत्रा 2025 चे उद्‌घाटन- 21 मार्चपर्यंत सुरू राहणार प्रदर्शन

तलाठी निवडीच्या बनावट आदेशांना बळी पडू नका;जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जागतिक महिला दिनानिमित्त विविध कलागुणांचा उत्साही अविष्कार व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान..

vishwatmaklokswamivarta

रत्नागिरीतील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था स्थापनेसाठी सविस्तर प्रस्ताव तयार करा- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश· कोकणातील उच्च कृषी शिक्षणाला मिळणार नवी दिशा