vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयात अभिजात मराठी भाष दिन संपन्न

जिल्हाधिकारी कार्यालयात अभिजात मराठी भाष दिन संपन्न

ठाणे, प्रतिनिधी- जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथील समिती सभागृहात आज अभिजात मराठी भाषा दिन संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, प्राध्यापक बेडेकर महाविद्यालय श्रीमती प्रज्ञा पंडित, जिल्हा मराठी समिती सदस्य श्री.राजेश राणे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्री.सर्जेराव म्हस्के पाटील, तहसिलदार (सर्वसाधारण) श्री.सचिन चौधर, तहसिलदार (संगायो) श्री.संदिप थोरात, तहसिलदार (रेतीगट) श्री.अमोल कदम आदि मान्यवर उपस्थित होते.  यावेळी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी मराठी भाषा विषयी बोलताना म्हणाले की, मराठी भाषेला जुनी परंपरा आहे. मराठी ही आपली मातृभाषा आहे. मातृभाषा ही मातृभाषेप्रमाणेच असली पाहिजे. तिला महत्व दिले पाहिजे. संवाद साधण्याचे कौशल्य आपल्या मातृभाषेत असले पाहिजे. पुस्तकाचे वाचन केले पाहिजे. पुस्तके जर आपल्या मातृभाषेत असतील तर वाचताना वेगळाचा आनंद मिळतो. दि.3 ऑक्टोबर 2025 ते 9 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

बेडेकर महाविद्यालयाच्या प्राध्यापक श्रीमती प्रज्ञा पंडित यांनी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, मराठी भाषा छान गोड बोली भाषा आहे. मराठी भाषेला 3 ऑक्टोबरला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला. त्याची वर्षपूर्ती होत आहे. अभिजात मराठी भाषा दिन साजरा करीत असताना मराठी भाषा जास्तीत जास्त बोलली गेली पाहिजे. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. सामाजिक आणि राजकीय स्तरावर हा दिवस महत्वाचा आहे. अभिजात दर्जा म्हणजे काय याबद्दल माहिती दिली. जगामधील बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषेचा 10 क्रमांक लागतो तर भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषेचा 4 क्रमांक लागतो असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा मराठी समिती सदस्य श्री.राजेश राणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सर्वांनी आपल्या भाषेचा अभिमान बाळगायला हवा.इतर भाषेतील कलाकारांचा कलेशी संबंध आल्यावर मराठी भाषेमध्ये उत्तम संवाद साधता येतो. असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित पोस्ट

इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरणामुळेमहाराष्ट्रात उद्योजकांसाठी पोषक वातावरण— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात पुढाकार घेण्याचे केले आवाहन

नवी मुंबई महानगरपालिकेस लोकाभिमुख डिजीटल सेवेचा ‘स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार’

vishwatmaklokswamivarta

रक्ताच्या नात्याने केले ‘निराधार’ पण तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाने दिला आपुलकीचा आधार.!

vishwatmaklokswamivarta

जेईई मेन परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी ..

vishwatmaklokswamivarta

पुणे शहरातील पाणीगळतीच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी कृतीदल स्थापन करा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

🏥💙 *महाडायलिसिस” अंतर्गत कुरखेडा येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण**